पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचे दर्शन घडावे असे मनोमन वाटते.परंतु एरवी सहजासहजी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घडते परंतु सध्या अधिक महिना असल्याने दर्शन रांगेतील पदस्पर्श दर्शनासाठी किमान ५ ते ६ तास दर्शनाला लागतात.
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्त यांना शॉर्टकटने दर्शन घ्यायचे असते त्यासाठी नवीन मार्ग शोधत असतात हे करत असतानाच हैदराबाद येथील विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक विठ्ठल मंदिराच्या परिसरात आले असता आम्ही बाहेरून आलो आहे आम्हाला तातडीने दर्शनाची सोय होईल का अशी चौकशी करत असताना या भाविकांची गाठ बडवे समाजातील एका युवक व उत्पात समाजातील एका व्यक्तीशी गाठ पडली.त्यावेळी दर्शना अगोदर १००० रुपये दर्शन झाल्यानंतर १००० असे २ हजार रुपयात दर्शनाची व्यवस्था करून देण्याचे ठरले या भाविकांना शॉर्टकटने जाताना मंदिरात कार्यरत असलेले यलमार नावाच्या पोलिसांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी या भाविकांना हटकले असता त्यांनी वरील प्रकार सांगितला.
ही बाब मंदिर समितीचे व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या दोघांवर पोलीस कारवाई करण्यात येईल असे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्तापर्यंत किती भाविकांनी शॉर्टकटने दर्शन घेतले याचा ही सुगावा पोलिसांना, मंदिर समितीला का लागला नाही. कारण ही दर्शनाची बऱ्याच वर्षापासूनची चेन आहे त्यात कोण कोण व किती जण सहभागी आहेत ? याला पुष्टी देणारा सुमारे एक वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आठवला.
एका एजंटाने डायरेक्ट तत्कालीन व्यवस्थापक यांच्याशी संधान बांधून शॉर्टकटने दर्शनास भाविकांना योग्य ती रक्कम ठरवून त्यांच्याच आशीर्वादाने सोडले जात होते परंतु या तत्कालीन व्यवस्थापकाला या येथील एजंटाने माझी चार माणसे आहेत ही सोडावे लागतील असे सांगितले परंतु त्यावेळेस प्रशासकीय अडचणीमुळे त्यांनीही त्या एजंटास आपण आत्ता माणसे सोडणार नाही असे सांगितल्याने भाविकांचे दर्शनही गेले व हातात खुळखळणारे चार पैसेही गेले यामुळे संतप्त झालेल्या या एजंटाने तत्कालीन व्यवस्थापक यांच्या अंगावर शहरातील भर चौकात हात टाकला कारण तुझ्यामुळे माझी माणसे दर्शना विना माघारी गेली व मला मिळणारे चार पैसेही गेले याचा राग ठेवून भर चौकातच या व्यवस्थापकाला प्रसाद दिला. हा प्रकार पंढरीतील अनेकांनी समक्ष पाहिला. विठ्ठल मंदिरात शॉर्टकट दर्शनासाठी मंदिरातील वरिष्ठापासून ते खालपर्यंत एक साखळी असून त्याच्या मधील दुवा म्हणजे हे एजंट लोक होय .आजही मंदिर परिसरात खुलेआम चर्चा चालू असते की पैसे घेऊन दर्शनाला सोडले जाते या प्रकारास कोणाचा छुपा पाठिंबा आहे हेही पोलीस खात्याने तपासणी करणे गरजेचे आहे. कारण आम्हाला कोणाची बाजू घेण्याचे कारण नाही परंतु अशा गैरकारभाराला आळा बसणे हे आमचे आद्य कर्तव्य म्हणणे तरी गैर ठरणार नाही.
कारण ७ ते ८ तास ताटकळत वारकरी भाविक भक्त यांनी दर्शनासाठी रंगीत उभे राहायचे आणि एखाद्या भक्ताने परगाव होऊन येऊन २- ५ हजार रुपये मोजून झटपट दर्शन घेऊन माघारी जायचे या गोष्टीच्या विरोधात असून यापूर्वीही आवाज उठवला आहे केवळ उत्पात समाजातील एक व्यक्ती व बडवे समाजातील एक व्यक्ती ही दोषी नसून त्याला प्रवृत्त करणारे त्याच्यामार्फत येणाऱ्या भक्ताची सोय करून देतो म्हणाले तेही तेवढेच दोषी आहेत. त्याकरीता नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी तथा कार्यकारी अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून याच्या मुळापर्यंत जाऊन शोध घ्यावा व जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. जेणेकरून अशा शॉर्टकट दर्शनासाठी कोणीही फंदात पडणार नाही.आणि एक चांगली सवय सर्वांना लागेल.