सोलापूर प्रतिनिधी
देशाचे सैनिक नेहमी देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. कुंटुबासमवेत सण साजरा करावासा वाटतो मात्र गावाकडे येणे अशक्य असते.सर्व सैनिक सिमेवर एकत्रित येऊन सर्व धर्मियांचे सण साजरा करित असतात.सैनिक देश सेवेचे व्रत घेतल्याने देशाची सुरक्षा करणे हेच सैनिकांचे रक्षाबंधन असते असे प्रतिपादन बी.एस.एफचे जवान अशोक तुपसमिंदर यांनी केले.
विनायक नगर येथील राजराजेश्वरी माध्यमिक विद्यालयात आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाप्रसंगी तुपसमिंदर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके होते. प्रशालेतील विद्यार्थिनींनी जवान अशोक तुपसमिंदर यांच्या सोबत रक्षाबंधन सण साजरा केले.त्यानंतर सर्व मुलांना राख्या बांधून,आरती ओवाळून, मिठाई वाटप करुन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
तुपसमिंदर पुढे म्हणाले, सर्व प्रदेशातील देशवासीयांनी सैनिकांसाठी मुख्यालयाद्वारे राख्या पाठवितात. सर्व सैनिक राख्यांचे आनंदाने स्विकार करुन रक्षाबंधन सण साजरा करतात.भावा बहिणीचे प्रेम असेच वृद्धिंगत व्हावी अशी मनोकामना व्यक्त करित सैन्य दलाची माहिती सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी विचार ऐकण्यास मिळाल्याने मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके यांनी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन शीतलकुमार पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मारुती कांबळे, संगिता नरगिडे,रेवणसिद्ध दसले, चंद्रकांत पाटील,रोहित हत्तरगी, शांतेश करजगी,सागर स्वामी, गुरुबाळय्या स्वामी, उंबरगीकर, बाळशेट्टी आदींनी परिश्रम घेतले.