सोलापूर प्रतिनिधी
खरीप हंगाम पेरणी झाल्यानंतर पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, भुईमुग, तुर आणि बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महेश बिराजदार यांनी केली आहे.
शेतकरी अडचणीत आहेत. त्वरीत या पिकांची पाहणी करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदन दक्षिण सोलापूर तालुक्याचे नवनियुक्त तहसिलदार किरण जमदाडे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी धोत्री, दर्गनहळळी व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थीत होते.