स्वराज्य पक्षाच्या निवेदनाची तात्काळ घेतली दखल
पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष गणेश माने यांनी मानले महसूल विभागाचे आभार
पंढरपूर प्रतिनीधी
स्वराज्य पक्षाच्या वतीने भंडीशेगाव तालुका पंढरपूर येथील 101 शेतकऱ्यांचे ऑक्टोंबर 2022/ 23 मध्ये अतिवृष्टीमुळे मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे कृषी अधिकारी व तलाठी यांनी पंचनामे करून त्याची यादी मंजूर करून पाठवली होती. एक वर्ष झाले होते. मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्यामुळे, स्वराज्य पक्षाच्या वतीने पंढरपूर तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. याची तात्काळ दखल घेत , महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यास चालु केले आहेत.
या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सरकारला मोबदला देण्याबाबत थेट अल्टिमेट देण्यात आला होता. यामध्ये येत्या दहा-पंधरा दिवसात शेतकऱ्यांना खात्यावर पैसे नाही जमा झाले, तर येणाऱ्या १०सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत पंढरपूर येथे येणार असून, त्यावेळी त्यांच्यासमोर स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. सदरचे निवेदन स्वीकारताच पंढरपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार बेल्हेकर यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून चर्चा करून. भंडीशेगाव येथील तलाठी यांना आदेश देऊन शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर व्हेरिफाय करून येत्या चार दिवसात पैसे सोडण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार १०१ शेतकरी यांना १५लाख ४हजार ९००रुपयाचे वाटप करण्यास चालु केले आहेत. यामुळे कर्तव्य दक्ष तहशिलदार सुशीलकुमार बेल्हेकर आणि महसूल विभागाचे स्वराज्य पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष गणेश माने यांनी आभार मानले आहे.
यावेळी तलाठी श्रीकांत कदम.शाखा प्रमुख विण्णु माने. विलास बापु माने.रमेश नाना शेगावकर. संतोष माने सर.प्रकाश यलमार. सुधाकर पवार सर. भंडीशेगाव चे माजी सरपंच मधुकर गिड्डे.युवराज भोसले. कपिल गिड्डे .सागर यलमार प्रदिप सुरवसे. धनाजी सुरवसे. नितीन शेंगावकर आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.