सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे व करत आहे
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका बाजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आपण पहात असून
मराठवाडा मधील पत्रकारांचे प्रश्न देखील दिवसेंदिवस जटील व गंभीर होत असून मराठवाडा मधील पत्रकारांच्या प्रश्नावर आपण आवाज उठवणार असल्याची माहिती उस्मानाबाद येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले आहे
शिवसेना नेते यांनी नुकतीच पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची सोलापूर येथे भेट घेऊन राज्यातील पत्रकारांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी पत्रकार आयुब शेख पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार उपस्थित होते