अकलूज प्रतिनिधी
तुकाराम साळुंखे पाटील यांचे आजाद मैदानावर मुंबई येथे आमरण उपोषण जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाजाच्या प्रलंबित मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा करत असताना राजकीय व प्रशासकीय अधिकारी व प्रतिनिधी का वेळ काढू पणा करतात प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सन १९९७ पासून घडशी समाजाच्या प्रलंबित मागण्याबाबत पाठपुरावा करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पंत जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे या दोघांनीही समाज ज्याला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही घडशी समाजाच्या शिष्टमंडळाला दिली होती राज्याच्या आदरणीय उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार बबनराव शिंदे दिलीप सोपल नर्सिंग मेगजी गणपतराव देशमुख अण्णासाहेब डांगे राजेंद्र अण्णा देशमुख उत्तमराव उत्तम प्रकाश खंदारे माळशिरस विधानसभा सदस्य रामभाऊ सातपुते लोकप्रिय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील विधानपरिषद आमदार या सर्वांनी घडशी समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अशी शासनाकडे शिफारस पत्र देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार समाज कल्याण मंत्री, सांस्कृतिक मंत्री व अन्य खात्याचे मंत्री यांना घडशी समाज महाराष्ट्रात दोन लाख वीस हजार असून विखरलेला आहे घडशी समाजाच्या मागण्या साठी वरील आमदार साहेबांनी शिफारस पत्र देऊन व पाठपुरावा करून सुद्धा या अधिवेशनात आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित का केला नाही याची शोकांतिका वाटत आहे असे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे यांनी बोलताना सांगितले.
घडशी समाजाच्या मागण्या घडशी समाजासाठी आर्थिक विकास मंडळ असावे श्री संत तुकाराम महाराज यांच्या नावे असावे घडशी समाजासाठी सांस्कृतिक विकास मंडळ असावे संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे नावे असावे घडशी समाजातील गरजूंना कसून खाण्यासाठी व उपजीविका भागवण्यासाठी शेती महामंडळा कुठून शेती मिळावी समाजातील घडशी कलाकारांना कलाकार म्हणून मानधन मिळावे शासन सेवेत घडशी समाजातील मुला मुलींना प्राधान्य देण्यात यावे विधान परिषदेवर समाजास प्रतिनिधित्व मिळावे किंवा अन्य महामंडळावर नेमणूक करावी समाज अल्पसंख्यांक असून अल्पसंख्यांक घोषित करावा किंवा अनुसूचित जातीत समाविष्ट करावा किंवा मागास प्रवर्ग देण्यात यावा जिथे समाज तिथे सभामंडप सांस्कृतिक भवन किंवा समाज मंदिर असावे घडशी समाज जिथे देवस्थान असेल तिथे भरपूर आहे त्यासाठी घडशी सेवेकरी यांना शासनाने मानधन चालू करावे समाजाची उपजीविका साधन म्हणून त्यांना उत्पन्न कमी आहे त्यासाठी शासनाने मानधन देणे गरजेचे आहे उदाहरणात गावे जेजुरी शिंगणापूर पाली खरसुंडी जावली शिर्डी धुळदेव म्हसवड पंढरपूर अंकोली फलटण धुळदेव तुळजापूर अशी अनेक गावे आहेत.
अशा या अनेक मागण्या पावसाळी अधिवेशनात नाही मान्य केल्यास आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर अमरून उपोषणासाठी बसणार आहोत असे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यात शासनाची काहीही नुकसान होत नाही कारण या समाजाला आजपर्यंत सरकारने काहीच दिले नाही या मागण्या जनहितासाठी व समाजाची हितासाठी आहेत.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाब शेठ जाधव सचिव सुनील दादा पवार खजिनदार माऊली जाधव सोलापूर जिल्हा अध्यक्ष पप्पू वनारे उपाध्यक्ष किशोर जाधव राज्याचे उपाध्यक्ष हनुमंत भोसले सातारा जिल्हाध्यक्ष अनिकेत पवार अमोल वानारे गणेश वाडेकर सांगलीचे तानाजी पवार अधिक साळुंखे योगेश धुमाळ पुणे जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रमोद भोसले कोल्हापूर चंद्रकांत कदम किरण धुमाळ शेखर धुमाळ दत्ता पवार दादा पवार सागर धुमाळ आप्पाराव धुमाळ विजय साळुंखे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.