मुंबई प्रतिनिधी
कॅपिटेशन फि ऍक्ट नुसार सन २०११ ते २०१४ पालकांकडून वसुल करण्यात येणारी पिटिए फि हि रु ५ होती तर सन २०१४ नंतर पाटिए फि हि रू ५० करण्यात आली, असे असताना सन २०११ ते २०२२ पर्यंत १० वर्षे भक्तीवेदांत स्वामी मिशन शाळेनी पाटिए फि म्हणून पालकांकडून पाटिए फि म्हणून रु १५० वसुल करून पालकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्या संबंधित पालक शितल झांबरे यांनी १७/०२/२०२३ रोजी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे, तसेच तक्रार दाखल करून घेण्यासाठी शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांनी हि आंबोली पोलिस ठाण्याला पत्र लिहून गुन्हा दाखल करण्यासंबंधी कळवले होते, पण आजतयागत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी केला आहे, गुन्हा न दाखल होण्यासाठी व शाळेला पाठिशी घालण्यासाठी पोलिसांवर दबाव तर टाकला जात नाही ना? असा सवाल महासंघाचे नितीन दळवी यांनी केला आहे.
चुकीची पाटिए फि वसुल केल्याच्या तक्रारी सोबत शाळा प्रशासनाने केलेली आर्थिक अफरातफर जसे शाळेला शाळेची जागा बक्षिस पात्र म्हणून मिळाली असताना देखील टाळेबंदित लाखो रुपये ईमारत भाडे दाखवणे, शाळा ज्या ईसकाॅन ट्रस्ट द्वारे चालवली जाते त्या ट्रस्टला बिनव्याजी करोडो रूपये लोन देणे, शाळा मुख्याध्यापकला लाखो रु अवैध लोन देणे अशा तक्रारी पण पुराव्यासह देऊनही आजतागायत शाळेवर गुन्हा दाखल झाला नाही, आंबोली पोलिसांनी १८/०२/२०२३ रोजीच पालकांच जबाब नोंदवला पण पालक जेव्हा आंबोली पोलिस ठाण्यात पाठपुरावा करतात तेव्हा त्यांना एकच उत्तर दिले जाते की तक्रार वांद्रे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या कडून मान्यते साठी प्रलंबित आहे.
महासंघाचे नितीन दळवी यांचे म्हणणे आहे कि शाळांच्या तक्रार करण्यासाठी पालक आपल्या मुलांचे भवितव्य साठी पुढे यायला कचरतात, पण जे पालक पुढे येऊन शाळांनी चालवलेल्या पालकांच्या लुटि विरोधात आवाज उठवतात त्यांना हि अशा प्रकारामुळे न्याय मिळत नाही व यामुळे बाकीच्या मनमानी शाळांना गैरव्यवहार करण्यास प्रोत्साहन मिळते, या बाबतीत तर शिक्षण उपसंचालकांनी पोलिसांना पत्र लिहिले आहे, तरी गुन्हा नोंदवला गेला नाही.
या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक विद्यार्थी महासंघाचे नितीन दळवी, प्रसाद तुळसकर व संस्थापक निलेश साळुंखे हे पालक शितल झांबरे यांच्यासह मा. न्यायालयात दाद मागणार.