छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचार सर्वांनी अंकीकारले पाहिजेत:- चारुदत्त बुवा आफळे
पंढरपूर प्रतिनिधी
हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथे ख्यातनाम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले.
सुरुवातीला चारुदत्त बुवा आफळे, रा. स्व. संघाचे संघचालक सुधाकर जोशी, जिल्हा कार्यवाह प्रतापसिंह टकले, तालुका कार्यवाह योगेश कुलकर्णी, मोहन मंगळवेढेकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि श्रवणीय नारदीय कीर्तनाला सुरुवात झाली.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा,या तुकाराम महाराजांच्या सुंदर अभंगरचनेत पूर्वरंगामध्ये अतिशय सुंदर निरुपण करताना सांगितले की जो अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत,जे गरीब आहेत,अशा लोकांची सेवा करणे म्हणजे साधूत्वाच लक्षण असून त्याच ठिकाणी देव सतत वास करत असतो,
त्याच पध्दतीने छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे एकमेव राजे होऊन गेले,आई जिजाऊंनी शिवरायांना लहानाचे मोठे करीत असतानाच विविध प्रकारचे संस्कार दिले,संतांचे विचार, न्यायदान, शस्त्रविद्या पारंगत केले, हिंदवी स्वराज्य उभारणी असताना स्वराज्यातील शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे,हिंदवी स्वराज्यात सर्वांना न्याय मिळाला पाहिजे,सर्व मावळ्यांना तितकाच जीव महाराजांनी लावावा,त्यामुळेच हिंदवी स्वराज्य निर्माण झाले,हे करीत असताना अनेक लढायांना सामोरे जावे लागले, अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती, कोंढाणा किल्ला,अशा अनेक संकटातून सहिसलामत सुटत स्वराज्याचा राज्याभिषेक करुन सुखाच हिंदवी स्वराज्य निर्माण केले,राज्य व्हावे ही श्रींची इच्छा,या युक्तीने संतांचे विचारांचे स्मरण करत संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जायचे, रामदास स्वामी यांची भेट घेऊन स्वराज्याची माहिती मिळवावी, यामुळे व्यक्तिपरत्वे राज्य न राहता हे राज्य कायम जनतेचे रहावे आणि जनतेचे कायम कल्याण करावे ही भावना प्रत्येक राजांनी जोपासली पाहिजे,सध्याच्या चाललेल्या घडामोडीवरही प्रकाश टाकत हिंदू धर्म टिकला पाहिजे आणि त्यासाठी अखंड हिंदुस्थान ताकदवान बनण्यासाठी सर्व हिंदूनी सजग राहून कार्य केले तर अखंड हिंदुस्थान एक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही,सांगत पंढरपूरकर श्रोत्यांना खिळवून ठेवले,शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला माऊली इगटे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम प्रकाश देशपांडे,यांनी सुंदर केली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम प्रमुख तेजस पाटील, प्रा. राजेश दंडे तसेच हिंदू साम्राज्य दिन उत्सव समितीचे आयोजक यांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला, कार्यक्रम ऐकायला पंढरपूरातील श्रोत्यांनी प्रचंड प्रमाणात शिवतीर्थावर गर्दी केली होती.