पंढरपूर प्रतिनीधी
आपणावर या निवडणुकीत काटा मारल्याचा आरोप केला गेला आहे. परंतु आपण कधीही असले पाप केलं नाही, अन् यापुढेही करणार नाही .असे चेअरमन कल्याणराव काळे स्पष्ट केले आहे. विरोधक यांनी काटा मारलेबाबत सांगताना ऊस ज्यांच्या नावे घातला आहे. हे बरोबर असले तरी तो ऊस काटा मारलेला नसून, काही जणाकडे बँकेची देणी असल्यामुळे त्यांच्या पातळीवर शेतकरी यांनी काढलेली ती पळवाट आहे. परंतु त्याच्याशी आमचा कसलाही संबंध नसल्याचा खुलासा चेअरमन कल्याणराव काळे यांनी केला आहे. त्यामुळे बिनबुडाचा आरोप करणारे विरोधक उघडे पडले आहेत.
वाडीकुरोली येथे काळे गटाच्या उमेदवार प्रचारासाठी सांगता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामधे चेअरमन काळे यांनी खुलासा केला आहे.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते साईनाथभाऊ अभंगराव, विठ्ठल परिवाराचे नेते युवराज पाटील, भगीरथ भालके,एड गणेश पाटील,सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, युवा नेते समाधान काळे, मारुती जाधव, सुधाकर कवडे, नितीन बागल, समाधान फाटे, माऊली जवळेकर, यांच्यासह विठ्ठल परिवारातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चेअरमन काळे यांनी आपल्यावर कारखाना अधोगतीला नेला असल्याचा आरोप केला गेला आहे. मात्र आपण नैसर्गिक आणि इतर आपत्ती मुळे अडचणीत आलो असलो तरी कारखान्याची अधोगती न होऊ देता प्रगती करून दाखवली असल्याचा पुरावा दिला. या पुराव्यामध्ये काळे यांनी स्व. दादानंतर आपल्यावर जबाबदारी दिल्यापासून या कारखान्यावर विविध प्रकल्प उभारणी केली आहे. या कारखान्याची जमीन वाढविली आहे.यामुळे या कारखान्यावर २२२ कोटी रुपयाचे कर्ज दिसत आहे. जरी कर्ज असेल तरी ते कर्ज एकरकमी भरण्यासाठी आपण हप्ते मागून घेतले असून जवळपास ५०कोटींचे कर्ज भरले आहे. यामुळे कर्ज फेडीमधून कोट्यवधी रक्कम वाचणार आहे. याचा फायदा भविष्यात सभासद यानाच होणार आहे. यामुळे काही अल्प शेतकरी यांची देणी राहिली होती. ती देण्यासाठी आपल्या स्वतः चे संपत्तीवर कर्ज काढून ते देणार असल्याचेही काळे यांनी सांगितले. कारखान्याच्या सांपत्तिक परिस्थिती मध्ये आपण वाढ केली असून सध्याचे मूल्यांकन ३७५कोटी रुपये होत असल्याचेही अभिमनाची कामगिरी आपण केली असल्याचा खुलासा काळे यांनी केला आहे.यामुळे विरोधक यांनी उतावीळ होत अफवा पसरून विठ्ठल प्रमाणे या कारखान्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु त्यांचा विजय तर सोडाच पण सभासद त्यांचे उमेदवारांचे डीपॉझिट जप्त करून दाखवतील असा ठाम विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे.
हा कारखाना उभारणीचा मुख्य उद्देश साध्य करीत असताना, केवळ व्यापारी तत्व न पाहता, अडचणीतून शेतकऱ्यांना बाहेर काढत असताना कारखाना अडचणीत येऊ लागला होता. तरीही आम्ही न सर्व काही सुरळीतपणे ही संस्था चालवीत असल्याचेही काळे यांनी सांगितले.
विरोधक असलेले अभिजीत पाटील यांनी धाराशिव येथे चांगले काम असल्याचे सांगून ,इकडील सभासद यांना भुलविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याच्या कारभाराचा भांडा फोड करण्यासाठी, त्या परिसरातील शेतकरी यांनी येऊन त्यांची वाईट अवस्था असल्याचे सांगितले. यामुळे बेबनाव करणारे अभिजीत पाटील यांची दिशाभूल उघड झाली असल्याचेही काळे यांनी यावेळी सांगितले आहे.
यापुढे आपण विठ्ठलवर पाच वर्ष राहून दाखवा असे म्हणत, असे जाहीर आव्हान आपण देत असल्याचे सांगत, त्यांच्यासारखं जमल जमल नाहीतर सोडलं. असे कारखाना चालविण्याचे काम आपले नसून, सुरुवातीपासून अडचणी पाचवीला पुजलेल्या असतानाही पूर्वी आपण जिल्यातील ऊस दर देणाऱ्या यादीत होतो. असेही काळे यांनी सांगितले आहे.
यावेळी युवराज पाटील यांनीही अभिजीत पाटील यांच्या अफवा पसरविण्याच्या कृतीवर टीका केली, त्यांनी सध्या विठ्ठलवर ऊस गाळप करताना बाहेरून बिगर सभासद यांचा ऊस मोठ्या प्रमाणात आणला असून, कामगार वर्गाचे शोषण सुरू केले असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत असल्याचे सांगितले. लवकरच विठ्ठल चे निवडणुकीत मतमोजणी मध्ये झालेल्या घोटाळ्याचा निर्णय येईल. असेही सांगत या निवडणुकीत विठ्ठल प्रमाणे गाफील न राहता त्याचे अनामत रक्कम जप्त करावं असे आवाहन युवराज पाटील यांनी केले आहे.
या बैठकीमध्ये साईनाथ अभंगराव, भगीरथ भालके, गणेश पाटील, सुधाकर कवडे, संभाजीराजे शिंदे, समाधान काळे, मारुती जाधव, अमोल रणदिवे, नितीन बागल, समाधान फाटे, रवी मुळे, यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे झाली आहेत.
धाराशिवच्या शेतकरी यांची ओरड...
अभजित पाटील हे आपण धाराशिव आणि इतर कारखाने चांगले चालवत आहोत. असे सांगून या भागातील सभासद यांची दिशाभूल करीत होते. याबाबत धाराशिव भागातील शेतकरी यांनी या बैठकीत हजेरी लावत, चक्क अभिजीत पाटील यांना आम्ही फसलो आहोत, तुम्ही फसू नका, असे आवाहन केले. यात खोटे निघाले तर आपली जमीन इथ बसून लिहून देईन असे ठामपणे सांगत गैरकरभाराचा पाढा वाचला. यामुळे या भागातील सभासद वेळीच सावध झाला आहे.
समाधान काळे यांनी महत्वाची भूमिका निभावली
या निवडणुकीत अभिजीत पाटील हे आपल ठेवायचं झाकून अन् लोकांचे बघायचे वाकून ही भूमिका जोरदारपणे पार पाडत. अफवा पसरवत विठ्ठल ताब्यात घेतला होता. यामुळे सहकार शिरोमणीचा
सभासद बळी पडू नये म्हणून अतिशय सावध पणे ही निवडणूक विठ्ठल परिवार लढवीत आहे. किंबहुना विठ्ठल मधील झालेली चूक सुधारून उपस्थित सर्व नेते एकत्रित आले आहेत. यामुळे मोठ्या फरकाने विजय निश्चित असल्याचे सांगितले. लाव रे तो व्हिडिओ असे म्हणत चुकीच्या कारभाराची स्क्रीन वर माहिती उपस्थित लोकांना दाखविली यामुळे वावटळीत त्यांच्याकडे गेले आता परत आमच्याकडे आपोआप येऊ लागले असून उत्तम प्रकारे मतदान होऊन सत्ता कायम राहील असा आशावाद व्यक्त केला आहे.