विशेष लेख
आज काल शिक्षणासाठी प्रत्येक पालक जागृत झाला आहे म्हणे.परंतू जागृत कशाबद्दल झाला हेच कळेना झाले आहे.असरचा अहवाल तर खुप चिंताजनक आला होता.( असर अहवाल गुगल वर सर्च करून पहा ) खर तर महाराष्ट्राची शिक्षणाची वास्तव स्थिती या अहवालातून समोर आली होती.
आजचे शिक्षणाचे वास्तव पाहिले तर अनेक मुलांना मराठी धड वाचता येत नाही.( पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशन ) इंग्रजी तर दूरचे आहे.
असरचा अहवाल आणि प्रत्यक्ष दहावी आणि बारावीचे निकाल पाहिले की आश्चर्य चकित होऊन जाल.लिहता - वाचता न येणारी मुलं पास होतातच कशी..? कोणती जादू यांच्यात काही दिवसात येते कळतच नाही.परंतू प्रत्यक्ष ही मुलं स्पर्धेत कधीच टिकत नाही. पालकांना जेव्हा शिक्षणाचे वास्तव व विदारक दृश्य कळते. तेव्हा पश्चातापाची वेळ येणार.तेव्हा वेळ निघून गेलेली असणार.
शिक्षणाच्या बाजारीकरणात अनेक अनेक क्लासेस व शाळा मार्क फूगवून देत आहेत.शिवाय शिक्षण व्यवस्थेने या बाजारू शिकणात मुलं नापास होणार नाहीत व स्पर्धेत टिकणार ही नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली आहे.मुलांना मार्क तर कागदावर चांगले दिसतात परंतु प्रत्यक्षात काहीच नसते. ही आजची शिक्षणाची व्यवस्था आहे.हे असरचा अहवाल आणि प्रत्यक्ष दहावी व बारावीच्या निकालानंतर दिसून येते.
सध्या पालकांना जागृत होऊन माझ्या मुलाच्या भविष्याशी कोण खेळ खेळत तरी नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे.बाजारू शिक्षणात अनेक स्किम घेऊन अनेक जण पुढे येतील परंतु त्याचा दगाफटका माझ्या लेकरांच्या भविष्याशी होणार नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे.
आज शाळा निवडताना प्रथम पालकांनी विचार करणे गरजेचे आहे.ज्या शाळेतून चांगले संस्कारीत शिक्षण, वास्तव शिक्षण, मूल्यांवर आधारित शिक्षण,कला गुणांना वाव देणारे शिक्षण, शाळांचे अंतर शिवाय त्या शाळेतील शिक्षण माझ्या पाल्यांच्या भविष्याच्या दृष्टीने कसे आहे. याचा विचार आज पालकांनी करणे गरजेचे आहे.या स्पर्धेच्या युगात खाजगी क्लासेस व शाळा मार्क तर वाढवून देत नाहीत ना याचा विचार ही पालकांनी करणे गरजेचे आहे.
आपल्या मुलांची क्षमता व त्याची शिक्षणातील आवड काय आणि किती आहे. यावर पालकांनी विचार मंथन करावे.आपल्या मुलांची स्पर्धा इतर मुलांशी नसून स्वतः त्याची स्पर्धा त्यांच्या बरोबर लावली. तर उद्याची शिदोरी बांधून खणखणीत होईल हे मात्र नक्की...
नाही तर आजचा निर्णय उद्याचा पश्चात्ताप होणार तर नाही ना..याची काळजी घेतलेली बरी.
माझा पाल्य, माझं भविष्य
लेखक - आनंद आलदर