मायणी प्रतिनिधी
कोविड पासून अनेक कुटुंब नागरिक बेरोजगार झाले असून महाराष्ट्र मधील अनेक कंपन्या बंद आहेत यासाठी युवा पिढीने खचून न जाता स्वयं रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे.
यासाठी शासनाकडून जे काही मदत मिळत असेल ती युवकांच्या पर्यंत पोहोचवणे यासाठी संघटना तटस्थ वचनबद्ध असून संघटनेच्या माध्यमातून नागरिक असो या नोकरदार अडचणीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कार्यकर्त्यांना मदत करणं अन्यायाविरुद्ध लढा देणे हे संघटनेचे काम असून संघटना नागरिकांच्या वर होणारा अन्याय सहन करणार नाही.
यासाठी संघटनेचे विचार प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्यासाठी गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता या विचाराने आम्ही पुढे पाऊल टाकत असून नागरिकांनी संघटनेसी संपर्क करून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सहकार्य करावे आम्ही सर्व पदाधिकारी 24 तास जनतेच्या सेवेमध्ये आहोत असे आव्हान खटाव तालुका अध्यक्ष बाबालाल मुल्ला यांनी केले व सर्व कार्यकर्त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.