फलटण प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती निमित्ताने महापुरुषांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी. या उद्देशाने अहिल्यादेवी होळकर जीवन चरित्र व कार्य याविषयी राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धांचे आयोजन सुजन फौंडेशन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील तसेच मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील एकशे सदोतीस कवींनी सहभाग नोंदवला आहे.सदर स्पर्धेचा निकाल खलील प्रमाणे
प्रथम क्रमांक - मंदाकिनी सपकाळ, सांगली द्वितीय क्रमांक विभागून विद्या सरतापे बुलढाणा , टी.के.गोसावी बीड व सचिन पाटील अलिबाग तृतीय विभागून - अनिलकुमार शहारे गोंदिया ,सुभद्रासूत आंधळे अहमदनगर , योगिता मापारी सातारा ,जयश्री बोरसे कल्याण व स.ना.जोशी नांदेड
उत्तेजनार्थ श्रीकांत कांबळे , श्रीगणेश शेंडे, प्रकाश वंजारी , प्रकाश सकुंडे व जयद्रथ आखाडे .विशेष उत्तेजनार्थ दिनेश कांबळे , दशरथ धायगुडे, चंचल जाधव, गणेश तांबे,मीनल कुडाळकर, पौर्णिमा शिंदे ,नीलिमा भिंताडे ,उज्वला बोरावके व प्रियांका सावंत. विशेष सहभाग धनंजय सोलनकर , मनीषा घुले , सुनीता महाजन व ज्योती कदम या कवींनी यश संपादन केले.
स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कवितांचा समावेश असणार पुण्यश्लोक काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि जयंती उत्सव समारंभाचे अयोजन रविवार दिनांक ४ जून २०२३रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत शरदचंद्र भवन सभागृह ,होळकर तलाव जवळ जेजुरी येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रम स्वरूप प्रास्ताविक व स्वागत, संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन, काव्य लेखन स्पर्धा बक्षीस वितरण, पुण्यश्लोक पुरस्कार वितरण, काव्य संमेलन - विजेते स्पर्धक व निमंत्रित कवी,आभार व समारोप आणि स्नेहभोजन अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न होणार आहे.काव्यसंग्रह , विजेत्या कवींचे तसेच सुजन फौंडेशनच्या या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.