सध्या सर्वत्र जत्रा उरूस यात्रा यांचा हंगाम चालू असून पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कासेगाव यात्रेनंतर पंढरपूर पासून नाव घ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मी टाकळी येथील लक्ष्मी देवीची यात्रा चालू असून ही यात्रा तीनच दिवस मोठ्या प्रमाणात भरली असते या यात्रेत सहभागी होण्यासाठी टाकळी ग्रामस्थ परिसर तसेच बाहेरगावी असलेले लोक यात्रेनिमित्ताने टाकळी मध्ये दाखल झाले असून आज यात्रेचा महत्त्वाचा दिवस असल्याने आज सकाळी लक्ष्मी देवीची व शिवेवरच्या देवीची मोठ्या उत्साहात सहवाद्य ढोल ताशा लक्ष्मीचा उदो उदो गजरात गाव प्रदक्षिणा करण्यात आली.
ही यात्रा प्रामुख्याने तीनच दिवस भरती या तीन दिवसांमध्ये ग्रामस्थांच्या वतीने लक्ष्मीच्या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम स्पर्धा कर्मणुकीचे कार्यक्रम आधी कार्यक्रमाची रेलचे असून लक्ष्मी देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून यात्रेच्या काळामध्ये गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामीण पोलिसांचा ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी चोक बंदोबस्त ठेवला असून तरीसुद्धा गावात या सर्वांच्या नाकावर टिपून दारू मटका आदी प्रकार चालू असल्याचे सर्रास ऐकवण्यात येते काही दारू धंदे तर कोचिंग क्लासेस भर रस्त्यावर चालू असून सुद्धा याकडे हे धंदे बंद करावेत म्हणून गेल्या दोन वर्षापासून लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ने ठराव करून ते दारूबंदी अधीक्षक ग्रामीण पोलीस अधीक्षक जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना देण्यात आले आहे.
तरीसुद्धा या निवेदनाकडे पोलीस प्रशासनाने काना डोळा केला असून यात्रा काळात अवैध धंदेवाले यांची चलती असल्याची यात्रेनिमित्ताने आलेले लोकातून ऐकला मिळत होती वास्तविक पाहता या तीन दिवसांमध्ये पोलीस प्रशासनाने हे अवैध धंदे बंद करण्याचे गरजेचे असताना तसे झाल्याचे दिसून आले नाही निवेदना ऐवजी अवैध धंदेवाल्याची वजन कमी आल्याची ही चर्चा चालू आहे टाकळी येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांनीही सामाजिक जाणवेतून विविध स्पर्धेचे आयोजनही केली असून उत्कृष्ट स्पर्धकांना हजारो रुपयाची बक्षीस ग्रामपंचायत सदस्य विविध नेते प्रतिष्ठित यांच्या वतीने ठेवण्यात आली आहेत.
या तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून रविवारी सोमवारी यात्रेची सांगता होणार आहे यात्रेनिमित्ताने लक्ष्मी टाकळी ही विविध स्टॉल दुकाने व ग्रामस्थ यात्रे निमित्ताने आलेल्या भाविकांनी गजबजून गेले आहे