भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथे वसंतदादांनी या भागातील उसाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जावा म्हणून सहकार शिरोमणी कारखान्याची उभारणी केली तसेच या गटातील असणाऱ्या विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला त्यामुळेच आज इथे एवढी मोठी संस्था उभा राहिली त्यामुळेच या भागातील विकास झाला असे मत सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले.
सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात सभासदांची चर्चा करण्यासाठी भाळवणी येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी कल्याणराव काळे हे उपस्थित होते.
यावेळी काका म्हेत्रे, दीपक गवळी,दिलीप भानवसे,दाऊद शेख,रामचंद्र भोसले, मोहन बोधे, सूर्यकांत म्हेत्रे, अशोक तिवटणे, सुनील पाटील,धोंडीराम शिंदे,शहाजहान शेख,सलीम तांबोळी,भिमराव जाधव, संदीप जाधव,सुनील कारंडे,बाळासाहेब गायकवाड, निहाल शेख,मधुकर चौगुले,हणमंत कौलगे, दत्ता देशमुख, नरेंद्र देशमुख,आदम शेख ,दत्ता वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले, मागील दोन-तीन वर्षांपूर्वी निरा भाटगरचे पाणी शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नव्हते त्यावेळी येथे आंदोलन करून अधिकाऱ्यांचा दहावा घातला होता. त्यामुळेच पाणीपुरवठा संस्था स्थापन करून शेतकऱ्यांना वेळेवर पाणीपुरवठा करता येऊ लागला यावर्षी उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना पाण्याच्या चार पाळ्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे शेतात उसाचे पीक शेतकऱ्यांना घेता येऊ लागले आहे .हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
विरोधक फक्त बिलाचेच बोलत आहेत परंतु मागील 20 वर्षात शेतकऱ्यांचे वेळेवर बिल दिले गेले आहे. सभासद यावर्षी बिल जमा झाले नाही म्हणून नाराज झाले नाहीत.त्यामुळे शेतकरी निश्चितपणाने आमच्या पॅनलला मोठ्या विजयाने निवडून देतील आणि या भागातील विकास करण्यासाठी पुन्हा संधी देतील असे मत काळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शकील काझी यांनी केले तर आभार लुकमान इनामदार यांनी केले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.