सोलापूर. प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा रायगड येथे साजरा केला जाणार असल्याची माहिती रायगड प्रतिष्ठान, निराळे वस्ती सोलापूरचे संस्थापक शिवाजी भोसले यांनी दिली.
बुधवार दि.31 मे रोजी दु 12.00 वा.दोन वाहने श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोठे नगर लक्ष्मी पेठ सोलापूर येथून रायगडकडे रवाना होणार आहेत. वारकर्यांसाठी प्रवासात भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे .
गुरुवार दि.1 जून रोजी सायंकाळी 6.00 वा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांचे भव्य आणि सुश्राव्य किर्तन होणार आहे.
शुक्रवार दि.2 जुन रोजी सकाळी 7.30 वा. रायगडा वरिल जगदीश्वराच्या मंदिराकडे पालखी निघते त्यावेळी भव्य आणि दिव्य वारकरी दिंडी निघणार आहे. या दिंडी मध्ये वारकरी परंपरे प्रमाणे विविध पाऊल, फुगडी, वगैरे सादर केले जाणार आहे. सदरची दिंडी ह भ प जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) व ह भ प बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराज यांचे अनेक वेळा कीर्तन श्रवण केले आहे . संत तुकाराम महाराज यांचे विचार घेऊन राज्यभिषेक सोहळ्यास आम्ही जात आहोत असे सुधाकर महाराज इंगळे यांनी सांगितले. तसेच 1674 साली रायगड येथे राज्यभिषेक झाला त्यावेळी गडावर गायन - वादन , संत पूजन मोठ्या प्रमाणात झाले आहे याची इतिहास साक्ष देत आहे. त्यामुळे यंदा कीर्तन व वारकरी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण मुख्य राज्याभिषेक होऊन 350 वर्ष झाले आहेत. त्यानंतर आता प्रथमच हा योग प्राप्त होत असल्याने ऐतीहासिक महत्त्व प्राप्त होत आहे.
जे वारकरी रायगडावर जाणार आहेत त्यांचेकडे वारकरी पोशाख असणे गरजेचे आहे. ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहावयाचे आहे त्यांनी एक जून रोजी उपस्थित रहावे असे आवाहन रायगड प्रतिष्ठान निराळी वस्ती सोलापूर संस्थापक शिवाजी (भाऊ)भोसले व विठ्ठल मोलाणे यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद ताटे , सचिन भोसले, संतोष जावळे, सुरेश अवताडे , दिपक घंटे , हृषिकेश झांबरे , अजिंक्य मोरे, इ.पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.