भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील परफेक्ट कॉम्प्युटर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त व महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.भीमराव शिंदे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजकुमार पाटील होते.
यावेळी उपसरपंच सविता लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत जाधव, अर्जुन लिंगे, सचिन कुचेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष राजश्री ताड, रयत क्रांतीचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, वीरशैव संघटनेचे शशिकांत विभुते, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष दिनेश चौगुले, संजय बाबर, निहाल शेख,श्रीराम देठे आणि यावेळी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. शिंदे म्हणाले क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज जागृतीसाठी जे कार्य केले आहे ते महान कार्य आहे यांच्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची दरवाजे खुली झाली. आज विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती ही संगणकामुळे होत आहे.सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे, असे मत प्राध्यापक भीमराव शिंदे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर के पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत माळवदे यांनी केले. आभार धनश्री पवार यांनी मानले यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.