माळशिरस प्रतिनिधी
जाज्वल्य देशभक्त, प्रखर हिंदुत्ववादी "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर" यांचा गौरव करण्यासाठी व त्यांचे जीवनकार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याच्या वतीने "स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा" माळशिरस शहरात काढण्यात आली.
सर्व धर्मातील लोकांना अगदी गाभाऱ्यापर्यंत प्रवेश मिळावा, यासाठी 'पतीत पावन' मंदिराचे निर्माण करणारे वीर सावरकर यांच्या विचारांची थोरवी किती महान होती हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचं आहे. या गौरव यात्रेतून ते साध्य होते आहे.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, मिलिंद कुलकर्णी, सचिन शिंदे, माधव काका मिरासदार, जयसिंह पाटील, निलेश देशपांडे, मामा पांढरे, नंदन दाते, विष्णुपंत केमकर, नंदन गाडगे,सुरेश पाटील, सुनील माने, सुरेश टेळे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते इतर मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.