सांगोला प्रतिनिधी
राजकारण हे समाजकारणाचे उत्तम साधन आहे... त्या राजकारणाच्या माध्यमातून स्व आबासाहेबांनी समाजकारण केले.समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्न केले.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लागली आहे...या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शिवसेना-शिंदे गट,भाजपा, काँग्रेसचे झपके सर, आनंद माने गट यांची आघाडी निर्माण करण्यात आली आहे..अशी आघाडी करीत आसताना स्व आबासाहेबांच्या राजकीय व सामाजीक धोरणाचा आदर्श घेऊनच ही आघाडी निर्माण करण्यात आली आहे... स्व आबासाहेब सुध्दा संस्थेच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन सोबत घेत असत... त्यांच पद्धतीने आजही शेतकऱ्यांच्या हितासाठी आघाडी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या संस्था निस्वार्थपणे उभ्या केल्या आहेत त्या संस्थेच्या प्रगतीसाठी पक्ष भेद बाजुला ठेवून ही आघाडी निर्माण करण्यात आली आहे.कारण जर शेतकऱ्यांच्या हिताच्या असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर तो संस्थेला फायदाच असतो.
आणि पक्षीय राजकारण करीत असताना प्रत्येक ठिकाणी राजकारण केलेच पाहिजे असे नाही...जर तुंम्ही उठता बसता राजकारण,राजकारण करीत बसला तर ते गैर आहे.. राजकारण करीत आसताना वाद विवाद हे वयक्तीक घ्यायचे नसतात.वैचारीक वाद विवाद असु शकतात.वैचारीक मतभेद असु शकतात..परंतु राजकारणाच्या माध्यमातून जर सतत एकमेकांना डोळ्यात बघत बसणे सुध्दा चुकीचे आहे... शेतकऱ्यांच्या संस्था वाचवण्यासाठी म्हणा कींवा चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी पक्षीय मतभेद बाजुला सारुन एकत्र येणे हे एक चांगले उदाहरण आहे...भले काहींना आशा गोष्टी पटत नसतील...परंतु जे नेते व गावातील जनमानसातील कार्यकर्ते काम करीत असतात त्यांना हा निर्णय योग्यच वाटला आहे...
शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रित येणे काहींना रुचत नाही पटत नाही..आशा मानसीकतेच्या लोकांना समजावणे सुध्दा फार कठीण आहे..असो समाजहितासाठी पक्षीय मतभेद सारुन एकत्रीत येणे कधीही चांगले असल्याचे मत भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले.