शर्यतीतील प्रथम विजेत्यांना दिल्या दोन थार गाड्या बक्षिस
विटा प्रतिनिधी रामदासभाई साळुंखे
खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली. या शर्यतीचे नियोजन चालू असताना डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या पब्लिसिटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कोण म्हणते चंद्रावर पाटील हे प्रसिद्धीसाठी स्टंट करत आहेत. परंतु चंद्रावर पाटलांनी करून दाखवले. त्यावेळी अनेकांची तोंडे बंद झाली. प्रथम क्रमांक येणाऱ्या गाडीला थार गाडी हे बक्षीस होते. पण शेवटी वाद निर्माण झाला की थार गाडी कोणाला द्यायची, त्यावर चार तास चर्चा झाल्यानंतर चंद्रावर पाटील यांनी थार गाडी प्रथम येणाऱ्या दोन्ही बैल गाड्या मालकांना दिल्या. पैलवान चंद्रावर पाटील यांच्या वृत्तीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.
काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली आणि यामध्ये प्रथम क्रमांकासाठी बकासुर आणि महिब्या या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवला आणि थार गाडीही पटकावली परंतु दोन बैल हे वेगवेगळे असल्याने थार गाडी ही नेमकी द्यायची कुणाला? असा प्रश्न आयोजक तसेच प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्वांनाच पडला परंतु यावर मनाचा मोठेपणा दाखवून पैलवान चंद्रहार पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलेले महिब्या आणि बकासुर या दोन्ही मालकांनाही दोन थार गाड्या बक्षीस म्हणून दिलेल्या आहेत त्यामुळे भारतातील सर्वात मोठी झालेली ही बैलगाडी शर्यत आता या दोन थार गाड्या बक्षीसांमुळे चांगली चर्चेत आलेली आहे.