पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्याचा नेता होणे एव्हढे सोपे नाही, केवळ परिचारक यांना विरोध करण्यासाठी ही निवडणूक विरोधकांनी लावली आहे, असेप्रतिपादन माजी आमदार श्री प्रशांत परिचारक यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होणार असून परिचारक गटाच्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक शेतकरी विकास आघाडी पॅनल ची काल रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी गादेगाव येथे जाहीर प्रचार सभा झाली.यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार श्री प्रशांत परिचारक म्हणाले,ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले.पण विरोधकांना तालुक्याचा नेता व्हायचे असल्याने, त्यांनी तडजोडीची तयारी न दाखविता निवडणुक लावली,पण तालुक्याचा नेता होणे एव्हढे सोपे नसते.
अशी टीका करून त्यांनी बाजार समिती ची मागील गेल्या ३० वर्षातील वाढती प्रगतीची कमान सांगितली. ते म्हणाले ही निवडणूक गावातील लोकांची आहे, त्यांना फार सांगावे लागत नाही,सोसायट्या ग्राम पंचायत यांची भूमिका महत्वाची असणार आहे. या बाजार समितील ७५ वर्ष पूर्ण झाली असून खरे काम १९४९ पासून सुरू झाले.१९९० साली प्रथम निवडणूक झाली.ही सहावी निवडणुक असून अनेकदा बिनविरोध झाली होती.
सुरुवातीला अतिशय कमी उलाढाल होती.डाळींब आणि बेद्याण्याच्या मार्केट मुळे आता ४८० कोटींची उलाढाल होत आहे.पण हा नफा मिळविण्याचा मार्ग नव्हे ही शेतकऱ्यांची संस्था आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शेतकऱ्याला उभे राहण्याचा अधिकार मिळाला आहे.उत्तम व पारदर्शक कार्याने आपली बाजार समिती राज्यातील ३०५ बाजार समित्यांत २१ वी आली आहे. अनेक उपक्रम राबवून हमाल भवन बांधण्यासाठी जागा व निधी दिला.
भविष्यकाळात सोलर सिस्टीम, अंडर ग्राउंड द्रेनेज, कोल्ड स्टोरेज, कांदा चाळ आदी कामे केली जातील असे ते म्हणाले. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, दाजी भुसनर, वामनराव माने, लक्ष्मण धनवडे, गणेश बागल, हरीश दादा गायकवाड, आबासाहेब देशमुख, पांडुरंग साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन कैलास खुळे, भास्कर कसंगावडे, प्रशांत देशमुख, दिलीप आप्पा घाडगे, सोमनाथ डोंबे, दिनकर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रचाराची पहिली सभा चळे येथे झाली होती.सूत्रसंचालन सुभाष मस्के यांनी केले.