करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब ता पंढरपूर येथील जलसंधारण विभागामार्फत सुरू असलेले तलावांची कामे उत्तमरीतीने सुरू असून सदर कामास अडवणूक व तक्रारी करणाऱ्यांना विरोध म्हणून ग्रामस्थांच्या वतीने विविध संघटना व ग्रामपंचायतने पुणे येथील अप्पर आयुक्त मुख्य अभियंता मृद व जलसंधारण विभाग पुणे यांना निवेदन देण्यात आले.
पुणे येथील कार्यालयात महिलांसह ग्रामस्थांनी हजेरी लावत सुमारे 300 ते 400 जणांनी उपस्थित अधिकारी यांना करकंब ग्रामपंचायतचा ठराव,महाराष्ट्र महाराष्ट्र विकास सेना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ,राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी(श.प.गट), रिपब्लिकन पार्टी आठवले गट,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,रिपब्लिकन पार्टी,भारतीय दलित महासंघ,धाडस सामाजिक संघटना आदीनी निवेदन देत पाझर तलावाचे काम उत्कृष्ट झाले असून उर्वरित काम त्वरित करण्याची मागणी केली आहे.
करकंब गावच्या हद्दीमध्ये ४० ते ४५ वर्षे जुने असलेले पाझर तलाव आहेत. याची आवश्यक ती दुरुस्ती यापूर्वी झाली नसल्याने सदर तलावात पाणीसाठा राहत नव्हता. या ठिकाणी करकंब क्र ५ व ६ या तलावांचे रूपांतर साठवण तलावामध्ये करण्याबाबत यापूर्वी ग्रामपंचायतीने ठराव दिल्यानंतर सद्यस्थितीत मृद व जलसंधारण विभागामार्फत क्र ५ व ६ येथे सदर कामे सुरू असून कामे अंदाजपत्रकाप्रमाणे व नियमानुसार व उत्कृष्ट पद्धतीने होत असल्याचे यावेळी तळ्याच्या बाजूच्या शेतकरी नागरिकांनी सांगितले व त्याचा फायदा आम्हाला होत असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
तलावाच्या कामाची स्थानिक शेतकरी गावातील प्रतिष्ठित तसेच ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी पाहणी केली जात असून तलावाच्या खंदकामाचे खोदकाम सुरू असताना विभागामार्फत सिमेंट ग्रावणाचे काम करून मगच काळी माती खंदकात भरलेली आहे त्यामुळे आता मे महिन्यात पडलेल्या पावसाने तलावात पाणीसाठा झालेला असून झालेल्या कामांमध्ये कामाच्या पायातून अथवा भरावातून गळती कसलीही गळती झाली नाही. तरी जलसंधारण विभागामार्फत सदर कामे लवकरात लवकर पूर्ण केल्यास येणाऱ्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होणार आहे त्यामुळे ही कामे त्वरित पूर्ण करावीत असा आग्रह शेतकऱ्यांनि धरला होता.
परंतु सध्या माढा तालुक्यातील एका संघटनेचा अध्यक्ष सदर कामावरील अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून कामे आडवून बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.सदर संघटनेमार्फत सदर काम निकृष्ट झाल्याच्या जाणूनबुजून तक्रारी करण्यात येत आहेत. संबंधित संघटना अध्यक्षाचा यापूर्वीचा इतिहास पाहता सदर व्यक्ती शासकीय कामात अडथळे आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करते संबंधिताच्या वैयक्तिक स्वार्थापायी कामाची व गांवाची बदनामी होत आहे.त्यामुळे या मृद व जलसंधारणाच्या विभागास आम्ही सर्व ग्रामस्थ हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे तसेच संबंधित तक्रारदार संघटनेचा आमच्या गावातील कामाशी कसलाही संबंध नाही. सदर संघटनेमार्फत पुनश्च काही तक्रारी आंदोलन करण्यात आल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे महिला,नागरिक व शेतकरी यांनी यावेळी बोलून दाखविले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी शरदचंद्र पांढरे,उपसरपंच प्रतिनिधी नाना शिंगटे, मा.ग्रा.पं.सदस्य सुनील मोहिते,सचिन शिंदे,महेंद्र शिंदे, परमेश्वर धोत्रे आदींसह शेकडो महिलासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आदी संघटनांनी दिले अधिकाऱ्यांना निवेदन....
राजेश खरे - अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विकास सेना,सुरेश भाऊ शिंदे - जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, आनंद लोंढे - जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ,ओंकार जाधव - राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी,राजु शिंदे - शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी आठवले गट,वंशदिप शिंदे - तालुका उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,महेंद्र शिंदे, नारायण गायकवाड - दलित महासंघ जिल्हाध्यक्ष,मनोज शिंदे - करकंब शहर कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, कुमार गायकवाड - भारतीय दलित महासंघ नेते,ग्रामपंचायत सदस्य नागेश गायकवाड,तानाजी जाधव - नेते,विजय नलवडे - धाडस सामाजिक संघटना,