वक्तृत्व कला आत्मसात करण्यासाठी चौफेर अभ्यासाची गरज:-प्रा.लक्ष्मणरावजी ढोबळे
करकंब प्रतिनिधी
करकंब नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व आणि सुत्रसंचालन कार्यशाळेच्या सांगता समारंभाला आदरणीय बहुजन रयत परिषदचे सर्वेसर्वा आणि माजी तंत्र शिक्षण मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुरुवातीला प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, आदिनाथ देशमुख, शरदचंद्र पांढरे, नितीन खाडे, डॉ प्रशांत मोरे, सुनिल अडगळे,सतिश देशमुख,तानाजी गायकवाड,अजित देशमुख, वंदना पंत आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे देवकी दुधाणे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून व्याख्यानाला सुरुवात करत असताना वक्तृत्व ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर सांगत असताना विद्यार्थ्यांनी बालवयातच ही कला अवगत केली निश्चितच यश प्राप्त होते पण ते करत असताना आपल्याला प्रत्येक विषयाचा चौफेर अभ्यास केला पाहिजे.
सुरुवात,शेवट हा रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवणारा असला पाहिजे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतीविषयकच बोललं पाहिजे,यांचं भान वक्त्यांनी ठेवलं पाहिजे, विश्वासराव भोसले यांनी सुभाषबाबू विषयी इतकी प्रचंड माहिती घेतली आहे की कुठलाही प्रसंग त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवला आहे.वक्तृत्व करताना महत्वाचे मुद्दे मांडत असताना आत्मविश्वास पूर्वक मांडले पाहिजेत आणि त्यात सुभाषिते,संस्कृत,कविता,एखादी इंग्रजी वाक्य,असली तर आपलं वक्तृत्व अधिक प्रभावीपणे होते,अशी अनेक उदाहरणे देत आपल्या आल्या मधूर वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.आणि या चारदिवशीय कार्यशाळेत डॉ सचिन लादे डॉ मैत्रेयी केसकर सोमनाथ गायकवाड आकाश थिटे यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन करत ही कार्यशाळा आम्हां सर्व सहभागी सदस्यांना भविष्यकाळासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार असून यातूनच वक्ते घडतील असा स्त्युत्य उपक्रम नादब्रह्म कला फाउंडेशन चे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी राबवल्या मुळे सर्वांनी कौतुक केले, भविष्यकाळात ही सर्व करकंब व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन आयोजकांनी केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे देवकी दुधाणे विशाल बोधे, विजय भागवत, देविदास काटवटे,बापू खारे,सुवर्णा टकले, श्रीराम टकले,आदींनी परिश्रम घेतले.