पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरातील सरगम चौकातील रेल्वे ब्रिज तसेच तालुका पोलीस स्टेशन जवळील ब्रिज हा वाहतुकीच्या कोंडीचा मोठा पॉईंट ठरला आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
शनिवार सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान सरगम चौकाच्या ब्रिज जवळ एक टेम्पो वळणावर बंद पडल्याने नवीन सोलापूर रस्ता, पुणे पंढरपूर रस्ता तसेच नवीन एसटी स्टँड करून पुण्याकडे जाणारा रस्ता हा हे वाहन मध्येच बंद पडल्याने गर्दीने व्यापून गेला होता. या चौकामध्ये तर आठ पंधरा दिवसाला एखादी अशी घटना घडतच असते. येणारी जड वाहतूक ही याच सरगम पुलाच्या खालून होत असल्याने सतत काहीना काहीतरी या मार्गावर घडतच असते. या कारणामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. असाच प्रकार शनिवारी साडेबाराच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशन जवळील ब्रिज खाली एक वाहन बंद पडल्याने या ठिकाणीही वाहनाची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने त्या ठिकाण वरून प्रवास करणाऱ्या लोकांना रस्ता काढणे कठीण झाले होते. असाच प्रकार सरगम चौक मध्ये भर कॉर्नरला भरलेला ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने चारी बाजूने वाहतुकीच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत होत्या.
वास्तविक पाहता सलग दोन दिवस आलेल्या सुट्ट्या वाहनांची वर्दळ यामुळे या मार्गावर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असते याकरता सकाळी व सायंकाळच्या वेळेस वाहतूक पोलीस वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असण्याचे गरजेचे आहे.
सध्या वाहतूक पोलिसांकडे एकच काम गाडी आहे. गाडी आडवं पावती फाड शहरात वाहतूक कोंडी व अडथल्याने वाहतुकीने रस्ता बंद पडू याचं या वाहतूक शाखेला काहीही देणे घेणे नाही. काही वेळा तर सावरकर चौकात वाहनांची एवढी गर्दी असते आणि अशा वेळेसच नेमके वाहतूक पोलीस तेथे नसतात असा प्रकार अनेक वेळा पंढरपूरकरांनी अनुभवला आहे तर एकाच चौकामध्ये चार चार पाच पाच पोलीस उभारून दुचाकी वाहने, टेम्पो, क्रुझर गाड्या अडवून वाहतूक परवाना आहे का ? लायसन आहे का? हे पाहण्याचे काम करतात त्यामुळे त्यांना शहरातील वाहतुकीमुळे मोठ्या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे लक्ष देण्यास वेळच नाही असेच म्हणावे लागत आहे.
हा वाहतुकीचा डोकेदुखीचा प्रकार केव्हा बंद होणार ? हे त्या परमेश्वरालाच माहीत, काही का असेना सध्या तरी सरगम चौकात अधून मधून एखादे वाहन बंद पडले अथवा पाऊस पडल्यास मोठ्या प्रमाणात झाला तर पाऊच्या पाण्यामुळे ही वाहतूक बंद होते एकंदरीत काय तर महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडी आणि रहदारीला अडथळा हा कायम वाहनधारकांच्या पंढरपूरकरांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे यावर तातडीने उपाययोजना होऊन निदान गर्दीच्या वेळी तरी दोन्ही वेळेला वाहतूक पोलीस फक्त वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या कामाकरता पोलीस प्रशासनाने लावावेत अशी नागरिकांतून चर्चा होताना दिसून येत आहे.