कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरच्या निवडणूक निकालने हेच दाखवून दिले की,नेहमीच विरोधकाकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे.तरी परंतु एखादी दुसरी निवडणुक वगळता परिचारकांना इतर कोणत्याही निवडणुकीमध्ये अपयश आलेले नाही . याही निवडणुकीमध्ये असेच घडले की जे होणार होते.
पांडुरंग परिवार आणि विरोधकातील काही नेतेमंडळी यांचे छुपे मनोमिलन झाले अशी पोकळ चर्चा असली तरी प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही द्वेषाने भरलेल्या राजकारणाचा अनुभव या ही निवडणुकीमध्ये आलाच आहे.
सोसायटी मतदार संघातील निकाल हा एकतर्फीच आहे परंतु ग्रामपंचायत विभागांमध्ये विरोधकांची कुवत 100 पार करण्याची नसताना त्यांना जवळपास 250 मते मिळाली हे सुद्धा त्याचेच उदाहरण होय.
विरोधकांनी त्यामध्ये स्वतःची पाठ थोपटून घेण्याची आवश्यकता नाही कारण विरोधाला विरोध म्हणून राजकारणामध्ये असे घडतच असते.
उलट या निवडणुकीमध्ये पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांना गावोगावच्या कार्यकर्त्यांना सक्रिय करून त्यांची इच्छाशक्ती वाढवण्याचे काम आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या निमित्ताने ही निवडणूक पांडुरंग परिवाराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. याचा फायदा येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी नक्कीच पांडुरंग परिवाराला होईल.
ही निवडणूक एकतर्फी होणारच होती. पांडुरंग परिवाराच्या दृष्टीने ती फार महत्त्वाची नसली तरी 2024 साठी दिशा देणारी आणि निर्णायक ठरली आहे. पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांनी आता असे ठरवले आहे की, 2024 ही निवडणूक कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचीच .त्यासाठी कोण कोणाबरोबर जातो
कोणाची कोणाबरोबर युती होईल
हे महत्त्वाचे नसून 2024 हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे असा पवित्राच कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आम्ही तीस वर्षापासून पाहतोय विरोधकांमध्ये सातत्याने नेता बदलला जातोय पण पांडुरंग परिवारामध्ये परिचारकांच्या आदर्शवत राजकारणाने परिवार एकसंध आणि मजबूत आहे आज जिल्ह्याचे आमदार आमचे नेते प्रशांतराव परिचारक यांना पोकळ आव्हान दिले जाते, पण एक नक्की आहे की,भुईमुगाच्या शेंगा बाजारामध्ये आल्या म्हणून बदामाचे दर कधीही खाली येत नाहीत"हे विरोधकांनी जाणून घ्यावे.