मुंबई प्रतिनिधी
वित्तीय तुटीवर नियंत्रण, आर्थिक वाढीला प्रोत्साहन, कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, मनुष्यबळ असं सर्व घटकांना सामावून घेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. देशाचा अर्थसंकल्प मांडतांना ५ ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यात महाराष्ट्राने ही आपला ५ लाख ४८ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करतांना १ ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेती क्षेत्राचा विकास दर हा सातत्याने दुहेरी अंकात आहे. सेवा आणि उद्योग क्षेत्राचा दर सुद्धा वाढता आहे. दरडोई उत्पन्नात वाढ झाली असून कृषी क्षेत्रात मागील आठ महिन्यात २७ नवीन सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. २६८ पैकी ३९ प्रकल्प यावर्षी पूर्ण होतील. कृषी व संलग्न अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी हे प्रकल्प सहाय्यकारी ठरेल. कृषी अर्थव्यवस्था १०.२ टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा भीमा मराठवाडा स्थिरीकरण प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री असताना जागतिक बँकेच्या सहकार्याने याकामी त्यांनी पुढाकार घेतला होता.
आ.मोहिते पाटील म्हणाले की मला खात्री आहे आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाला तेच निश्चित न्याय देतील. या प्रकल्पाने ६ जिल्हे, ३१ तालुके आणि १२ लाख एकर हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जवळपास साडेतीन कोटी लोकसंख्येला या योजनेचा फायदा होणार असून ही महत्वाकांक्षी योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील.
निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नवीन तंत्रानुसार बंद पाइपलाइन द्वारे पाणी गावांना पोहचणार आहे. माझी विनंती आहे की माळशिरस तालुक्यातील कोथळे भाम, जळबावी, पठाण वस्ती, चांदापुरी, पिलिव, सुळेवाडी, बचेरी, शिंगोरणी, तरंगफळ, काळंमवाडी, गारवाड, नगरवाडी या तेरा गावांचा समावेश देखील यात करण्यात यावा अशी विनंती केली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजना त्यासाठी ५० कोटींची तरतूद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी केली आहे, या योजनेत मौजे बावी, तुळशी, परितेवाडी, अहिरगाव, पडसाळी, अंबड गाव, अंजनगाव, शिराळा, पिंपळखुटे, कूर्डू ही १० गावे समाविष्ट करण्यात यावी अशी विनंती आ.रणजित सिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.
अनेक नगर परिषदा, नगरपालिका क्षेत्रात शेतीचे क्षेत्र असते. अशी अनेक ठिकाणे राज्यभरात आहेत अशा नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील गावांना जिल्हा परिषदेच्या कृषी विषयक योजनांचा लाभ मिळावा अशी विनंती सभागृहात केली आहे.अशी माहिती आ.रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी सांगितली आहे.