ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
समाजात हल्ली ठरवुन होणार्या विवाहाचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने झपाटयाने कमी होत चालले आहे. हल्ली प्रेमविवाह करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात असुन, पुर्वी शहरी भागातच याचे प्रमाण सर्वाधीक होते.मात्र अलीकडे ग्रामीण भागातही याचे लोण फुटले असुन, प्रेम विवाहाला सर्वाधीक पसंती दिली जात आहे. दरम्यान प्रेमाला घरातुन विरोध असेल तर पुर्वी किमान आई, वडिल, कुटुंब व घराण्याची इज्जत या गोष्टीला अग्रक्रम दिला जात असे.हल्ली या गोष्टीची पर्वा न करता विरोध असेल तर पळुन जाण्याच्या घटनांमध्ये चिंता करावी इतपत वाढ झाली असुन आता ग्रामीण भाग ही शहरी भागाला हम भी किसीसे कम नही असे म्हणतानां दिसतो आहे. दरम्यान या घटनांमुळे पालक वर्ग ही चिंतीत झालेला आहे.
पुर्वी या घटनाचें प्रमाण तुरळक होते.पण प्रचंड लोकप्रिय झालेल्या सैराट चित्रपटानंतर ग्रामीण भागातही मुला मुलीचें धाडस वाढुन पळुन जाऊन प्रेम विवाह करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
पुर्वी ग्रामीण भागात अशी एखादी अर्धी घटना घडायची आणि तिची गावभर चर्चा व्हायची. हल्ली गावा-गावात नेहमीच या घटना घडायला प्रारंभ झाल्याने या घटनाचेंही फारसे कुणाला काही वाटेनासे झाले आहे.
सैराट होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे आश्चर्यकारकरीत्या वाढ झालेली आहे. अर्थात या बाबदच्या बहुतांश तक्रारीचीं पोलीस दप्तरी नोंद होतेच असे नाही. बर्याचशा घटनांमध्ये पळुन जाणारे युवक युवती दोघेही सज्ञान असल्याने इच्छा असुनही पालक केवळ बघ्याची भुमिका घेत गप्प बसतात.
पळुन जाणारे प्रेमी हल्ली प्रेमात इतके अंध झालेले आहेत कि अनेक ठिकाणी पर जातीय, पर धर्मीय जोडपी पळुन जात आहे. काहीनीं तर नात्यानांही तिलांजली दिल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. तर बहुतेकदा विवाहीत असतानांही प्रेमाच्या नावाखाली काहीनीं पलायनाचा मार्ग स्वीकारला आहे.
दरम्यान दिवसेदिवस घडणार्या या घटनांमुळे पालक ही संभ्रमित झाले आहेत. शाळा,महा-विदयालयात शिक्षण घेतानांच ही प्रेम प्रकरणे जास्त रंगताना दिसत असुन मुलानां शाळा, महा-विदयालयात पाठवावे कि नाही? हा प्रश्न पालकांपुढे उभा ठाकतो आहे. तसेच मोबाईल हे साधन ही या गोष्टीला जास्तीत जास्त सहायकारी ठरत असुन त्याचा वाढता दुरुपयोग ही एक भीषण व तीव्र अशी सामाजीक समस्या बनत चालली आहे.
त्यातच शासनाने लग्नाचे वय १८ वरुन २१ पर्यंत केले.अर्थात काही अंशी हा निर्णय लाभदायी असला तरी आताची संस्कृति व जीवनशैली पाहता हा निर्णय नुकसानकारक ही ठरतानां दिसतो आहे.
एकुणच समाजाची घडी बिघडत चालली असुन, वाढता स्वैराचार अनागोंदीला आमंत्रण देत आहे. वेगाने बिघडते समाजस्वास्थ्य पाहता अजुन किती अधोगती होणार ? हा सवाल लोक विचारत आहेत.