पेन्शन विषयी सामान्य माणसाला काय वाटते?
विशेष लेख
त्यांनी सुद्धा घेण्याचं काहीच कारण नसते, तरीदेखील त्यांच्यावर शेकडो कोटी रुपये वर्षाला खर्च केले जातात. एक व्यक्ती पाच वेळा आमदार झाला, पाच वेळेचे पेन्शन म्हणून दिले जातात आणि जो माणूस आयुष्यातले सर्व वर्षे लोकांच्या सेवेसाठी नोकरी म्हणून काम करतो त्याच्याकडे मात्र पेन्शनच्या बाबतीत लक्ष दिले जात नाही यात देखील सर्वोच्च अधिकारी, प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग, आणि त्याखाली कर्मचारी वर्ग अशी विभागणी केली गेलेली आहे, आणि त्यांना मात्र पेन्शनच्या बाबतीत दुजाभाव केला जातो. माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार जे विधानसभेचे असो किंवा विधान परिषदेमधील असो हे मात्र त्यांच्या पगार वाढीचा आणि त्यांच्या सुविधा देणाऱ्या आर्थिक तरतुदींचा एक मुखाने, एकमताने ठराव करून वाढवून घेतात आणि त्या वेळेला शासनाच्या तिजोरीवर भार टाकतात. अशावेळीशासनाची आर्थिक स्थिती चांगली आहे की नाही हे मात्र बघत नाही आणि ज्या वेळेला सर्वसामान्य नागरिक असो किंवा सर्व सरकारी कर्मचारी असो यांच्या विषयी कुठलाही विषय चर्चेला येतो त्यावर मात्र चौकशी समिती नेमणे किंवा सत्य शोधणे अशी कारणे सांगून त्यांना टाळले जाते किंवा त्यांच्या प्रश्नाकडे नकारार्थी म्हणजे करायचं नाही या दृष्टीने बघितले जाते. एवढे आपण सामान्य मतदारांनी नागरिकांनी सहन करून पुन्हा किती वेळा कोणीही असो कुठल्याही राजकीय पक्षाचे असो यांना कशासाठी निवडून द्यायचे हा खरा प्रश्न आपल्या सर्वसामान्य नागरिकांना मतदारांना पडला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे... आणि हे सगळं करत असताना मला एक व्यक्ती डोळ्यासमोर येते ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे एडवोकेट कपिल सिब्बल ज्यांनी नुककतेच सोशल मीडिया वरती मी भारत देशाचा रक्षक बनेल अशा अर्थाच्या दृष्टीने एक ईमेल वरती नोंदणी करण्यासाठी आवाहन केलेले आहे त्याच्यावर तर आपण सर्वांनी नोंदणी करावी आणि त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे अशी माझी विनंती तर आहेच पण त्यापेक्षा माझी सर्वच महाराष्ट्रातील नागरिकांना आणि त्याहीपेक्षा मतदारांना विनंती आहे की आत्तापासून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा संघटनेच्या व्यक्तीला उमेदवाराला मतदान करू नका बहिष्कार टाका असल्या नालायक आणि घाणेरड्या लोकशाहीपेक्षा पुन्हा आपली जुनी जी खेड्यापाड्याची पद्धत होती त्या पद्धतीने गावचा कारभारी संयुक्तरीत्यां आपण सर्वजण देऊन आपापल्या गावांचा विकास करूया आणि या सर्वच लोकप्रतिनिधींना मातीत गाढूया असा निर्धार करूया माझे हे लिहिणे कदाचित काही राजकीय कार्यकर्त्यांना आवडणार नाही परंतु आत्ता सध्याची वेळ या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणून ठेवलेली आहे त्याकरिता आपण आता जागृत व्हायला हवे अन्यथा पुन्हा तुम्ही डोळे वर करून, ताठ मानेने कुणीही कुठल्याही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकप्रतिनिधीला जाब विचारू शकणार नाहीत ही मात्र खात्री आहे तेव्हा जागृत व्हा आणि हे सांगतोय त्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये घरी बसा मतदानासाठी बाहेर पडू नका तरच आपण आपला विकास साधू शकतो.
एक सामान्य माणूस
उत्तम अभंगराव, पंढरपूर, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र.
संपर्क 84 59 59 15 83.