कर्जबुडवे उद्योगपती चालतात, तर नोकरदारांना पेन्शन मागितली तर कुठं बिघडलं..?
पंढरपूर प्रतिनिधी
जुनी पेन्शन लागु व्हावी या प्रमुख मागणीसाठी मागणीसाठी शासकीय कर्मचारी व निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या संपासंदर्भात आज पंढरपूर येथील पंचायत समिती आवारात सुरू असलेल्या कर्मचारी आंदोलनास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवुन या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.. यावेळी बोलताना युवासेनेचे युवानेते रणजित बागल म्हणाले की, या सरकारला देशाचे कर्ज बुडवून पळुन जाणाऱ्या उद्योगपतींनी उभारलेल्या कर्जाच्या डोंगराची फेड करण्यासाठी सरकारी तिजोरी रिकामी करण्यास अडचण येत नाही मात्र शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना नोकरीकाळानंतर "अंत्योदय" साठी महत्वाची असणारी पेन्शन देण्यास अडचणी येतात, ही मोठी शोकांतिका आहे.. हा संप चिरडून टाकुन सरकारला या सर्व सरकारी कार्यालयाचे खासगीकरण करून धनदांडग्या उद्योगपतींच्या दावणीला सर्वसामान्यांना बांधायचे आहे, हा कुटील डाव आम्ही यशस्वी होवु देणार नाही, पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही या आंदोलनासोबत खंबीरपणे उभे आहोत, असे बागल म्हणाले
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख संजय घोडके म्हणाले की, या सरकारला शेतकरी कष्टकरी छोटे व्यापारी उद्योजक आणी यानंतर आता सरकारी नोकरदार या सर्वांना उध्वस्त करायचे आहे. त्यांना या कर्मचाऱ्यांचा संप मोडायचा आहे परंतु आम्ही आता या संपकर्यांसोबत आहोत त्यांमुळे आगामी काळात तीव्र लढा देवुन यांना नक्की न्याय मिळवून देण्याकामी आम्ही सोबत असु असे घोडके म्हणाले,
यावेळी उपजिल्हासमन्वयक युवासेना पप्पू तांबोळी,बंडु घोडके,उमेश काळे,संजय पवार,समाधान गोरे,भारत जाधव, बाळासाहेब पवार,हरिश्चंद्र तळेकर,प्रणित पवार,स्वप्निल गावडे,संजय कृष्णा घोडके,वैभव ननवरे,पृथ्वीराज ननवरे,नवनाथ सुरवसे, यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.