पंढरपूर प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ मंगळवेढा येथे निषेध मोर्चाचे आयोजन केले होते त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सहभागी होऊन देशातील विरोधक संपवण्याच्या सुडभावनेतून राज्यातील आणि केंद्रातील सरकार काम करत आहे.
एका बाजूला सर्वसामान्य जनता महागाई बेरोजगारी यामध्ये भरपूर निघत असताना देशात ठराविक भांडवलदारांना पोचण्याचे काम सरकार करत आहे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ना केंद्र सरकारचा आधार आहे ना राज्य सरकारचा मोदी सरकार कुठल्याही परिस्थितीत आपली सत्ता जाऊ नये आपल्या विरोधात कोण प्रबळ विरोधक तयार होऊ नये यासाठी सातत्याने काम करतोय आणि त्याचाच धडा घेऊन राज्यातलं सरकार ही शेतकरी कष्टकरी गोरगरिबांचा विचार न करता सत्तेचा सारीपाठ खेळण्यातच मशगुल आहे.
या माध्यमातून केंद्र सरकारला एकच प्रश्न विचारला संसदेमध्ये साडेपाचशे खासदार आहेत राहुल गांधी सोडून एकावरही कोणता गुन्हा दाखल नाही असं आहे का जर तसं नसेल तर एकट्या राहुल गांधी वरच कारवाई का असा प्रश्न देशातील जनतेसमोर उभा राहिलेला आहे एक प्रकारे देशांमध्ये अघोषित आणीबाणी मोदी शहा या जोड गोळीने लागू केली आहे तिची व्याप्ती हळूहळू वाढवत आहेत आणि जर आपण सर्वजण असं शांत राहिलो तर एक दिवस ही वेळ आपल्यावरही येऊन ठेपेल.