करकंब प्रतिनिधी
करकंब श्री विरभद्र यात्रा व महिलादिनाचे औचित्य साधून करकंब येथे विरभद्र महादेव मंदिरात नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संध्या पाठक सांगत होत्या.
गेले तीन दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक,सांस्कृतिक,कार्यक्रमाची सांगता नारदीय कीर्तनाने झाली,पूर्वरंगामध्ये भजायचा देव देवासाठी नाही या डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या सुंदर अभंगावर निरुपण करताना सांगितले की देव आपण समजतो ते देवासाठी नाही तर आपण आपल्या सुखासाठी भिजतो,त्याच अस्तित्व आधीही होत आताही आहे आणि पुढेही राहणार त्यामुळे जीवन चांगलं जगायचं असेल तर त्यासाठी नामस्मरण करत कर्म केले पाहिजे,जीवन जगण्यासाठी काय काय कराव लागत ते करीत असताना आपला शाश्वत आनंद कशात आहे ते ओळखलं पाहिजे,आणि तो आनंद आपल्या अंतरंगातच आहे पण हरणाच्या कस्तुरी सारखं जग दुसरीकडं भरकटत चाललेलं दिसतय स्वतःला ओळखा,प्रचितीचा प्रपंच करा तोच खरा परमार्थ आहे,प्रत्येक व्यक्तिन आपला धर्माच पालन करणे आवश्यक आहे.
त्यामध्ये आईनं आईची कर्तव्य,मुलान मुलांची कर्तव्य वडीलांनी वडीलांची कर्तव्य पार पाडणेच म्हणजे धर्माचं पालन करणे होय परंतू या कलीयुगात यांचा विसर पडत असलेला दिसून येतो, आई-वडीलच आपलं दैवत आहे त्यांची सेवा करा,आवश्यक आहे त्यावेळी सर्व गोष्टींची पूर्तता होणे,म्हणजेच भगवंताची कृपा होय, सुंदर अशा पूर्वरंगानंतर उत्तररंगामध्ये समर्थ रामदास स्वामींचे चरित्र सांगून खरी श्रीमंती कशाला म्हणायची अनेक दृष्टांत दिले,ज्ञान प्राप्त करणे हीच खरी श्रीमंती ती आत्मसात करा असे सांगितले त्यांना अप्रतिम साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम राम अनवते यांनी केली,या कीर्तनाचे प्रायोजकत्व बाळासाहेब घाडगे आणि ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले होते.
श्री विरभद्र महादेव मंदिर वतीने सामूहिक आरती झाली आणि समाजसेवक सचिन शिंदे यांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, सकाळी भव्यदिव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे प्रायोजक दिलीप गोंधळी यांचे वतीने विजयी स्पर्धकांना पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
त्यावेळी विरभद्र पंच कमिटी,तसेच वैभव हत्तरगे,संतोष स्वामी, दत्तात्रय खंदारे सर, राहुल हत्तरगे,शरदचंद्र पांढरे,सतिश देशमुख,अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते