पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूरात अगदी माणुसकी जपणारी माणसे आहेत ती पाहून असे वाटते की इतर माणसापेक्षा पंढरपूरातील माणसेच श्रेष्ट आहेत. त्यांचे एक अत्यंत सोपे उदाहरण म्हणजे आमचे मित्र गणेश दुरूगकर यांनी सर्वसामान्यांसाठी चालू केलेला पोळ्याचा (चपाती) कारखाना, अगदी गोरगरीब लोकांना परवडणारा, पोटाची आग भागवणारा, व होतकरू महिलांना रोजगार निर्मिती करणारा कारखाना (5 रू.चपाती) आजच चालू केला आहे. खरेतर या गोष्टीचा गणेश यांना कुठलाही फायदा नाही. गणेश चे एकच म्हणणे आहे की 1 रूपयाला 1 रूपया मिळावा पण लोकांना दुप्पट दर देऊ नका. व सर्वसामान्याना त्रास देऊ नका यावरच त्यांनी अनेक योजना राबविल्या आहेत, 1 किलोवर 1 फ्री अशा अनेक वैशिष्ठपुर्ण योजना राबविल्या आहेत व त्यांचा फायदा अनेक सर्वसामान्य माणसांना झाला आहे हे 100 टक्के खरे आहे.
मी त्यांच्या दुकानी बसलो असता एक सर्वसामान्य स्त्री आली व तिने विचारले एक गुलाबजामन देणार का. तर त्यावेळेस गणेश दुरूगकर समोरच होते त्यांनी सांगितले या बोर्ड वर लिहिलेल्या सर्व गोष्टीची येथे पालन केले जाते. व त्याचवेळेस त्या लहान मुलांस एक गुलाबजामून त्या कामगारांनी दिला व हे सर्व आम्ही बघत होतो त्या आईने त्या मुलांला गुलाबजामुन दिला व त्या मुलांनी तो खाल्ला पण त्या मुलांच्या व आईच्या डोळ्यात जी चमक होती त्यामुळे माझेही डोळे ओले झाले. या सर्व घटनेस आम्ही सर्व मित्र साक्षीदार आहोत.
गोरगरीबांना मदत करून फोटो काढून अनेक नेते व सामाजीक कार्यकर्ते आपण पाहिले आहेत पण गणेश दुरूगकर यांची एकदा आपण समक्ष गाठ घ्या म्हणजे त्यांचे विचार किती उच्च आहेत म्हणण्यापेक्षा सर्वसामान्यांना मदत करणारे आहेत हे आपणास जाणवतील.
5 रू. ला चपाती ही गोष्ट खरी आहे का ? हे पाहण्यासाठी मी स्वत: त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्का बसला तेथे चपाती बनविण्याचे कामच चालू होते. यावेळेस मी गणेश बरोबर बोललो असता त्यांनी सांगितले की आपण नाश्ता करण्यास गेलो तरी 50 रू जातात पण सर्वसामान्य मजुरी करण्यार्या किंवा आर्थिक अडचणी असलेल्या माणसाजवळ ही रक्कम देणे शक्य नसते किंवा त्याला खर्च करू नये असे वाटते म्हणून तो चालढकल करतो व आपले मन मारतो पण तो माझ्याकडे आला तर त्यास पाच रूपये पोळीचे काहीच वाटत नाही. हीच गोष्ट लक्षात ठेवून मी गोरगरीब व गरजू लोकांसाठी अशी योजना चालू केली आहे. प्रत्येकांच्या घरात अनेक अडचणी असतात हाच धागा पकडून मी स्वस्तातील व सर्वसामान्यांना परवडणारी योजना चालू केली आहे.यात कुठलेही फसवेगिरी नाही स्वस्त,स्वच्छ व भेसळमुक्त योजना चालू केली आहे तरी पंढरपूरातील सर्व सामान्य जनतेने गणेश दुरूगकर यांनी काढलेल्या या चपाती कारखान्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.