ः शाळेतील आठवणाना मिळाला उजाळा
ः सुसंस्कारक्षम पिढी घडविण्याचा गुरूजनांचा संदेश
: या स्नेह सोहळ्यास उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षक आदी.
पंढरपूर प्रतिनिधी
: या स्नेह सोहळ्यास उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षक आदी.
पंढरपूर प्रतिनिधी
शाळा सोडून ४५ वर्ष लोटली, त्यानंतर वर्गमित्रांची भेट अपवादात्मकच. इतक्या वर्षात अनेकजण बदलली असतील, कसे असतील सगळे. शाळेचे सर ओळखतील का आपल्याला, पण स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने याच प्रशनांची उत्तरे शोधण्याची संधी मिळाली आहे. ती का सोडायची ? अशा एक ना अनेक प्रशनांचा काहोर आणि जुन्या आठवणाना उजाळा देत ४५ वर्षानंतर गुरू शिष्यांच्या भेटीचा स्नेह सोहळा अनमोल रूपी भावनांचा ठेवा देवून उत्साहात संपन्न झाला.
असेच भावनाप्रधान वातावरण बहरले होते ते म्हणजे पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील न्यू इंग्लिश स्कुलमधील 1977-78 च्या इयत्ता दहावीच्या च्यावतीने पंढरपूर येथे आयोजीत केलेल्या स्नेह सोहळ्या प्रसंगी. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक माणिक चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर सिरसाट, सौ.सिरसाट, पुष्पलता निकम, माजी जि.प.अध्यक्षा डॉ.निशिगंधा माळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक दत्तात्रय कदम यांनी केले. तर यावेळी मार्गदर्शन करताना मधुकर सिरसाट, माणिक चौधरी, पुष्पलता निकम, ह.भ.प चिंतामणी घोडके यांनी सुसंस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत व आई वडीलांची सेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित माजी विद्यार्थीनी शोभा घाडगे, माधुरी जोशी, सुलभा जोशी, सुलभा वाघ, शैला कुलकर्णी यांनी मनोगतातtन शाळेतील जुन्या आठवणाना उजाळा दिला. या स्नेह सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी आपल्या कुटूंबीयांसह उपस्थित होते.
भेटीचा आनंद अन आपुलकीची विचारपूस
पंचेचाळीस वर्षांनी आपल्या मित्र मैत्रिणाची भेट होत असताना प्रत्येकाच्या चेहर्यावर या भेटीचा आनंद दिसून येत होता. तर हा आनंदच या स्नेह सोहळ्याची उर्जा ठरला. त्याचप्रमाणे भेटणारा प्रत्येक मित्र ऐकमेकांची आपुलकीने विचारपूस करीत हितगुज साधत होता आणि उर्वरीत आयुष्याच्या सुख दुखात सहभागी होण्याची ग्वाहि देवून आपल्या मैत्रीच्या भावना व्यक्त करीत होता.
जीवनाची उमेद वाढविणारे स्नेहसंमेलन
आपआपल्या प्रपंचातील गाडय़ामध्ये रमलेली मित्रमंडळी एकत्र करून पंचेचाळीस वर्षानंतर पुन्हा मैत्रीची शाळा भरविण्याचा गेल्या अनेक दिवसांपासुन असलेला मानस आज पुर्ण झाला. सर्व मित्रांना भेटल्यामुळे अन सर्वांच्या खुशालीने जीवनाची उमेद वाढविणारे हे स्नेहसंमेलन ठरले आहे. या आठवणी आयुष्यभर मनाच्या गाठोडय़ात बांधून ठेवल्या जातील यात शंकाच नाहि. या कार्यक्रमाचे संयोजक माजी विद्यार्थी दत्तात्रय कदम यांनी केले होते.