पंढरपूर प्रतिनिधी
श्री. रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर या संस्थेच्या वतीने राजाधिराज योगीराज स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न .
प्रारंभी सामुहिक महाराष्ट्र गीत गाऊन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास संस्था सचिवा सुनेत्राताई विजयसिंह पवार यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवभक्तांना मार्गदर्शन करताना सुनेत्राताई पवार म्हणाल्या की छत्रपती शिवराय हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाही मधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली .अशा या शिवरायांच्या सैन्यात मराठी सैनिक सर्वात जास्त होते .तर शिवरायांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले डोंगरी, भुईकोट व सागरी भागात काबीज केले . अशा या शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला झाला असे सांगितले
तर निकिता कदम या विद्यार्थिनींने शिवरायांच्या जीवनावर बोलताना म्हणाली की छत्रपती शिवराय हे सर्व जाती, धर्म, वंश या पलीकडे विचार करणारा राजा होता असे सांगून यांची लढाई ही अन्याय, अत्याचार व सरंजामशाही विरुद्ध होती त्यांनी तलवारीच्या बळावर नव्हे तर बुद्धी कौशल्याच्या जीवावर जिंकली. शिवराय हे संयमी राजे होते असे सांगितले.
कार्यक्रमास संस्था मार्गदर्शक रवींद्र साळुंखे, प्राचार्या नंदिनी गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापक संतोष कवडे, रुक्मिणी बँक संचालक जयश्री खडतरे, सविता लोखंडे व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलनदीप टापरे यांनी केले तर विभावरी डुबल यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश डुबल , अभिजीत कोष्टी, भंडारे, सोमनाथ साळुंखे ,दिनेश आगवणे, अशपाक मुजावर ,माधुरी बोडके फरहणा कादरी, मनीषा पाटील ,सुवर्णा जगदाळे ,वैशाली कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.