वर्धा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने मध्यावधी फेरआढावा याचिका महाराष्ट्र विद्रूप नियामक आयोग यांच्या कडे विजवाढीसाठी याचीका दाखल केली आहे ही दरवाढ मंजूर झाल्यास या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसेल हि दरवाढ करू नये तसेच आयोग हरकतीसाठी बैढक आयोजित करेल त्यावेळी वर्धा जिल्हा किसान सभेच्या पदाधिकारी यांना बोलवावे यासाठी मा्.राहूल कर्डिले जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोग यांना निवेदन देण्यात आले
विजवितरण कंपनीने केलेल्या प्रस्तावित दरवाढ सुचविली यासाठी विज विद्यूत नियामक आयोगाने लोकांकडून दि.१५-२-२३ पर्यंत हरकती मागविल्या आहेत याचा वर्धा जिल्हा किसान सभेच्या वतीने कडाडून विरोध करीत आहे यासाठी खालील बाबी सुचविण्यात आल्या आहे
१)विजेची खरी वितरण गळती जास्त आहे ती तपासून कमी करणे
२)रास्त व स्पर्धात्मक दरात विज खरेदी करणे, महागड्या विजेची खरेदी बंद करणे
३)अवाजवी खर्च कमी करणे
४)कामाचे योग्य नियोजन करणे
५) भ्रष्टाचार संपुर्णपणे हद्दपार करणे
६) नियमितपणे देखभाल दुरुस्ती नसल्याने वाढीव विजगळती रोखण्यास अपयश आले आहे यास ग्राहक जबाबदार नाही
७) वाढीव आणि अवास्तव दराने कलेल्या विज खरेदी करायचा बोजा विज ग्राहकांवर टाकता कामा नये
या वरील सर्व बाबी विचारात घेऊन कार्यवाही केल्यास विजदरवाढ करण्याची गरज भासणार नाही या बाबी लक्षात न घेता विज मंडळाने दरवाढ सुचविली आहे जेव्हा की भारतातील व शेजारच्या अनेक राज्यांत महाराष्ट्रात विज महाग आहे.कंपणीने योग्य नियोजन केल्यास विजदरवाढ करण्याची गरज भासणार नाही सबब हि दरवाढ फेटाळावी व योग्य नियोजन करायचे आदेश कंपनीला द्यावेत तसेच ई सुनावणी वेळी संघटनेला आपले म्हणने मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना वर्धा जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष काॅ.एकनाथ डोबले, सचिव व्दारकाताई ईमडवार, कार्याध्यक्ष काॅ सुरेश गोसावी,काॅ गजेंद्र सुरकार, कोषाध्यक्ष काॅ विनायक नन्नोरे ,काॅ.रामभाऊ दाभेकर,काॅ.लिलाधर देशमुख,काॅ.मारोतराव ईमडवार,काॅ.जितेन्द्र गोरडे,काॅ.बि.एन.लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.