श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाव ऐकलं की आधी आठवते मोहीम .. संभाजीराव भिडे गुरुजी नाव ऐकलं की आधी आठवते मोहीम ... होय मोहीम ...
खर तर मोहीम नावातच जादू आहे . मर्दानीपणा आहे , अभिमान आहे , स्वाभिमान आहे .
यंदाची मोहीम ही श्री भीमाशंकर ते श्री शिवजन्मभूमी श्री शिवनेरी अशी होती , मोहिमेला 14 वर्षाचा असल्यापासून मी जातो मध्यंतरी मोहिमेला जाण थांबलं होत . पण या वर्षी निर्धार केला अन काही झालं तरी जायचं ठरवलं . खर तर श्री क्षेत्र भीमाशंकर पासून मोहीम म्हणल्यावर वातावरण एकदम मस्त असणार हे माहिती होत . थंडी देखील असणार ही पण कल्पना होतीच . मोहीम दिनांक 29 ला सकाळी निघाली जोशपूर्ण वातावरण हलगीच्या ठेक्यात प्राणप्रिय भगव्या ध्वजाच्या मागे हजारो धारकरी घोषणा देत निघाले . भिमाशंकर च्या डोंगरदऱ्यात मावळ्यांचा आवाज घुमू लागला . पुढे अंतर कापत निघालो , थोडं बसायचं मग चालायचं हा आला का तो आला का मग वाट बघायची सगळे एकत्र करून पुन्हा चालायचं . हा दिनक्रम सुरू होता . पहिला मुक्काम आहुपे गावात होता . आम्हाला पोहचायला 7 वाजले तेव्हा समजलं गावात कोणाला येऊ देत नाहीत . एक 20 - 30 घराचं गाव असेल , वनवासी असलेले लोक राहत होते पण सर्वजण धर्मांतर करून ख्रिश्चन झालेले समजलं . पूर्ण गाव ख्रिश्चन मिशनरी चालवत होते जाणूनबुजून त्यांनी मोहिमेतल्या लोकांना गावात येऊ दिल नव्हतं . रात्री कधी झोपेल झालं होतं पडताच क्षणी झोप लागली .
दुसरा दिवस सकाळी 7 ला चालणं सुरू केलं . धुक्यामध्ये हरवलेला सह्याद्री मनाला सुख देत होता . धुक्याने चादर पांघरून टाकली होती . तश्या वातावरणात चालणं सुरू होत . दुसरा दिवस हा तसा खूप कष्टाचा गेला , चढाई उतरण , घसरण , हाल होऊ लागले . पण मोहीम म्हणजे काय हे समजायला हवं ! त्या काळी स्वराज्य उभं करणं किती अवघड होतं हे तेव्हा समजत जेव्हा घसरून दरीत पडतो का ही भीती असते . जीवाची बाजी लावून कसे लोक लढले कसे महाराज गडकिल्ले घेऊन स्वराज्य उभं केलं हे तेव्हा समजत . दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजले तरी मुक्काम येत नव्हता , वरसुबाई मंदिराजवळ मुक्काम होता व वरसुबाई काय येत नव्हती . अंग दमून गेलं होत , पाठीवरच्या ओझ्याने मान खाली देखील होत नव्हती , कधी झोपेल झालं होत . एक गाव लागलं मध्ये , आता मुक्काम गावात करू अन सकाळी जाऊ म्हणून त्या गावात मुक्काम केला . जेवण काही जात नव्हत म्हणून गावातील एक आजीला रात्री उठवून थोडी भाजी भात करून घ्या म्हणून विनंती केली . त्या आजीने भाजी आणि भात करून दिला , मस्त गावरान जेवण करून जवळच असलेल्या गोठ्यात मुक्काम केला .
एवढी रात्र झाली होती 10 वाजले 11 वाजले 12 झाले 1 वाजले 2 झाले तरी लोक चालत जातच होते . मोहिमेला संख्या किती ? हा प्रश्न मोठा होता . किती वाजूदे लोक चालताच . आम्ही अंदाज केला 30 हजार लोक असतील .
तिसरा दिवस सुरू झाला , आजचा दिवस हा भांडाऱ्याचा दिवस होता ... मोहीम म्हणलं मी भंडारा कधी तिथे जातो अन भांडार खातो अस होत , गरम भात आणि भाजी .... मोहिमेतील ते एक वेगळं सुख असत .आम्ही अजून दुसऱ्या दिवशीच्या मुक्काम जवळ पोहचायचो होतो . 7 km वरसुबाई आहे म्हणून सांगितलं , आम्ही चालतो पण वरसुबाई काही येईना , एक डोंगर दुसरा डोंगर मध्ये थोडं सपाट माळ पुन्हा चढण अस करत 10 च्या पुढे दुसऱ्या दिवशीच्या मुक्काम जवळ पोहचलो , तोपर्यंत ध्वज पुढे गेला होता .
तिथून पुढे आलो वळण घेऊन डोंगराच्या खाली एक गाव होत त्यामार्गे जायचं होतं , काही जण म्हणले शॉर्टकट्स घेऊन डायरेक्ट उतरू पण पहिल्या दिवशी च्या अनुभवाने नको म्हणून मोहीम मार्गाने जाऊ म्हणलं . पण यश वर्षी खर मोहीम मार्ग एक नसून दिसेल तिकडून मार्ग होता.....बघेल तिकडे नुसती माणसं होती , एक या वागळीतून ओळ आहे . एक रोड वरून आहे . एक झऱ्याच्या मार्गाने आहे , एक खड्डी आहे पण सगळीकडे नुसते माणसं .... एवढी अचाट गर्दी . गावामधून रस्ता गेला होता. पण गावाकडेच्या एक ही शेताला त्रास कोणी दिला नाही . आज ही शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला तोषिश नको हे महाराजांचे आदेश मावळे पाळत होते . एवढे हजारो नव्हे नव्हे लाखो लोक होते व कोणाची साधी काढी देखील हलली नाही . एवढी शिस्त भिडे गुरुजींनी लावली आहे .
बसत उठत एकरी मार्गात चालत एक गावात आलो आता भांडार थोडा राहिला आहे थोडं बसू न मग लगे जाऊ म्हणून आम्ही बसलो 1 तास बसलो , मग चला म्हणून चालू लागलो . पुढे बघतो तर ही मोठी गर्दी ,आणि एकेरी मार्ग करत भांडाऱ्याला सोडत होते . चला म्हणलं गर्दीमध्ये आता रांगेला उभे राहू . दुपारी 1 वाजता तिथे उभारलो . गर्दी थोडी थोडी पुढे सरकत सरकत होती . पण नंतर मध्येच सर्व थांबलं . मग समजलं पुढे तांबे म्हणून गाव आहे आणि तिथे लोकांनी गावामधील मार्ग बंद केला आहे . तिथे देखील तोच प्रकार , ख्रिश्चन ... आपल्या भूमीत आपल्या मावळ्यांना आपल्या लोकांकडून अडवले जात होते . म्हणून गावाच्या बाजून 4 km मार्ग काढावा लागला . आदी चालून दमलेले त्यात पुन्हा हे अजून चलन ... वैताग आला पण भांडार खायचा म्हणून बसलो . 4 झाले 5 झाले 6 वाजले तरी चालतो रांग सुरू ... भांडाऱ्याचा मंडप दिसू लागला पण रांग थांबायची . 7 झाले थोडं नजीक आलो आणि 8 च्या दरम्यान आम्हाला ताट हातात आले . ताट देणारे उभे हितो एक गाडा आला अन ताट टाकून गेला . तेव्हा तो म्हणाला 70 हजार च्या वर झाले .... आम्ही आवक झालो एवढी संख्या ....
ताट घेतलं तो भात संपला ..... पुन्हा अर्धा तास वाट बघितली . गरम भात कधी खातो झालं . लाईन मध्ये गेलो अर्धी भातवडी भात मिळाला त्याला म्हणूल लगा अजून दे केवढा दिला , त्याने उत्तर दिलं , लागेल तेवढा घ्या माघारी या . एक तर एवढं दमलेला 1 ला लाईन मध्ये आलेलो 8 ला ताट मिळालं पण एवढा भात दिला म्हणून थोडं पुढे गेलो अन अधाशी पणाने गरम भात नुसता नारड्यात ओतला अन पुन्हा अजून घेतला ....पुन्हा तीन वेळा भात खाल्ला तेव्हा वर वाटत.
थोडं वेळ बसलो पुन्हा चालणं सुरू आता हा शेवटचा मुक्काम होता शिवनेरी च्या पायथ्याला . तरी जेवण करून 7 किमी चाललो आणि एक गाव लगाल तिथे मुक्काम केला . एक घर होत त्याला पुढे शेड होत , घरच्या मालकांना विनंती केली ते काका बिनदस्त झोपा म्हणाले , पाणी दिल त्यांनी . आणि त्या दिवशी मस्त झोप काढली .
चौथा दिवस सुरू झाला , आवरलं आणि आता शिवनेरी च्या पायथ्याला जाऊ म्हणून निघालो . आज समारोप होता . तिथून तरी 3 एक किमी चालतो आणि मुक्काम जवळ पोचलो . सर्वानी आवरा आवर केली . आज समारोप होता कपडे बदलले . पण एवढं असताना अजून संख्येचा अंदाज येत नव्हता , नक्की 80 हजार असतील असे वाटल . जुन्नर शहरांमधून आज भव्य पदयात्रा निघून पुन्हा मोहिमेचा समारोप होणार होता . आम्ही जुन्नर कडे जायला निघालो ... बघतो तर हे नुसतं भगवं वादळ माणसांची गर्दी ..... एकच हुरूप .....एवढं चाललो एवढी अबदा झाली पण ते लोक बघून तो नजारा बघून सगळं क्षीण नाहीसा झाला .... अंगात उर्मी अली , गुर्मी अली...... अरे किती - किती किती .... नुसती 35 च्या आतली पोर ..... एवढे लोक आपल्या मोहिमेला .... नुसतं वादळ ! अरे नाही महावादळ ! भगवं वादळ ... होय! काय माणसं ही गर्दी कोणाची हे सैन्य , कोणाचं ? अरे कोण ही माणसं ? कशाकरता अली ? 4 दिवस कोण बोलवलं .... एकच उत्तर ..... शिवप्रभूंची ही फौज होती आणि ही फौज गोळा केली होती भिडे गुरुजी नावाच्या माणसाने ..... काय गर्दी ! शब्दच नव्हते . जुन्नर शहर आज भगवं झालं होतं , ती शिवजन्मभूमी आनंदात होती . एवढे मावळे आज शिवप्रभूंच्या चरणाशी आले होते . लाखो ..... होय लाखो लोक . 4 दिवस स्वतःच अन्न स्वतः बरोबर स्वतःच राहायचं साहित्य स्वतः बरोवर कोणती अपेक्षा नाही , कोणतं मागणं नाही , फक्त एका निरोपावर आलेली ही लोक होती . जुन्नर मध्ये समारोप पार पडला आणि गुरुजींनी 39 व्या मोहिमेचा शुभारंभ केला .
तस तर देव , देश अन धर्माच्या कार्यात मी आलो आणि तेव्हा भिडे गुरुजी नाव ऐकल नुसतं ऐकल नाही तर त्यांना 12 - 13 वर्षाचा असल्या पासून पाहिलं , ऐकल आणि तेव्हापासून या कार्याची आवड निर्माण झाली . त्याग , समर्पण काय ते त्यांच्याकडे बघून समजलं . ह्या वर्षीची मोहीम ही अद्वितीय झाली 1लाख 23 हजार च्या आसपास संख्या यावेळी होती . ह्या गर्दी मागे कोणती दंगल नाही कोणे विषारी पणा नाही . ही गर्दी गुरुजींच्या त्यागाने जमा झालेली होती . शिवछत्रपतींचा संभाजी छत्रपतींचा रक्तगट तयार व्हावा म्हणून ही गर्दी होती . एक अलौकिक मोहीम पार पडली .
शिवप्रभूंना मानाचा त्रिवार मुजरा.......
गुरुजींना वंदन .....
- सुदर्शन यादव, मंगळवेढा