जिल्हा प्रतिनिधी / वर्धा आकाश सुखदेवे
महाराष्ट्र राज्याचे माननीय डीसीएम तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगलो येथील कार्यालयात त्यांचे OSD सुमीत वानखेडे यांच्याकडून विदर्भातील शेतकऱ्यांना दोन प्रमुख सुविधा देण्याबद्दल शासनाची भूमिका जाणून घेतांना संघर्ष ॲग्रो वर्धा चे संस्थापक संचालक प्रशांत अवचट व राहुल मुन.विदर्भ आणि महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांच्या कल्याणत्मक धोरणावर विस्तृत चर्चा केली.
सुमित वानखेडे यांनी शेती आणि शेतकरी यांच्या विषयी शासनाच्या स्पष्ट धोरणाची आराखडात्मक माहिती दिली आणि वर्तमान राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र स्थानी ठेवून त्यांच्या हिता करीता ज्या योजना व धोरणे आखली आहेत त्यांची मुद्देसूद माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या प्रती कर्तव्यबद्ध,कटीबद्ध असल्याचे या प्रसंगी त्यांनी आश्वस्त केले.