सोलापूर प्रतिनिधी
अन्याय अत्याचार विरोधात लेखणीची धडाडणारी तोफ म्हणून ओळखले जाणारे राजापूर येथील दैनिक महानगरी चे पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली असून अश्या भ्याड हल्ल्याचा पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने निषेध व्यक्त करून झुंजार व अभ्यासू पत्रकार शशिकांत वारीशे राजापूर येथील रिफायनरी विरोधात नेहमीच जनमतांचा आवाज बुलंद करून रिफायनरी संदर्भात वृत्तसंकलन करत होते त्यांची दैनिक महानगरी टाइम्स मध्ये शेवटची बातमी दिनांक 06फेब्रुवारी 2023 च्या अंकात प्रसिद्ध झाली होती आंगणेवाडी यात्रे निमित्त पंतप्रधान मोंदीसह मुख्यमंत्री ग्रहमंत्री यांच्या बॅनर वर गंभीर गुन्ह्यांतील आरोपी चे फोटो असल्याची ती बातमी होती राजापूर येथे रिफायनरी प्रास्ताविक होऊ शकणाऱ्या भागात जमिनीचे व्यवहार करणाऱ्या पंढरीनाथ आंबेरकर असल्याची माहिती मिळत असून याच आंबेरकर सोमवार दिनांक 06फेब्रुवारी रोजी दुपारी 1वाजता राजापूर महामार्गवरील पेट्रोल पंपावर पत्रकार शशिकांत वारीशे यांना पाहिले बेसावध असलेल्या पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या दुचाकी वर वाहन घालून हत्या केल्याचा आरोप असून पत्रकार वारीशे यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रत्नागिरी व तेथून कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते गंभीर दुखापत झाल्याने पत्रकार शशिकांत वारीशे शुद्धीवर आलेच नाहीत अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले.
पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या म्हणजे लोकशाही ची निर्घृण हत्या
रामचंद्र सरवदे आक्रमक
राज्यात प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राबवला जात नसल्याने पत्रकारांवर होणाऱ्या हाल्यात वाढ झाली असून बातमी लावण्यावरून वाळू माफिया गुटखा माफिया जमिनीचे व्यवहार करणारे दलाल यांच्याकढून पत्रकारांवर हल्ला करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून राज्यात आता पत्रकार सुरक्षित राहिला नसून ही बाब नक्कीच लोकशाही ला मारक असून अश्या हल्ले खोरांना जबर शिक्षा झाली पाहिजे तसेच या *प्रकरणी कायदेशीर कठोर शिक्षा तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी राज्याचे राज्यपाल यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे*