प्रणव परिचारक यांच्या उपस्थित शेतकरी बांधवांचा मोर्चा
पंढरपूर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी व पांडुरंग परिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारचे शेती पंपाची विज बंद करण्याचे कोणतेही आदेश नसताना पंढरपूर विजवितरण कंपनीच्या अधिकारी यांनी मनमानी कारभार करत शेतकर्ऱ्याचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे सर्व शेतकर्ऱ्याची पिके धोक्यात येत आहेत व जनावरांचा पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. यात वितरण अधिकाऱ्याच्या आडमुट्या धोरणामुळे शेतकरी अडचणीमध्ये येत आहे.
सोलापूर जिल्ह्याचे आ.प्रशांतराव परिचारक यांच्या सुचनेनुसार व युवक नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पंढरपूर व पांडुरंग परिवार यांच्या वतीने हाजारो शेतकरी बांधवाना सोबत घेवून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, पंढरपूर या ठिकाणी निवदेन देण्यात आले. व अधिकाऱ्यास सर्व शेतकऱ्यांनी जाब विचारला असता त्याठिकाणी त्वरीत विज पुरवठा सुरळीत करतो असे आश्वासन दिले.
गेल्या दहा ते बारा दिवसापासून महाराष्ट्र राज्य सरकारचा कोणताही जीआर नसताना डि.पी. ट्रान्सफार्मर उतरवण्याचे काम सुरू केल्याने अतिशय चांगले काम करणारे तसेच शेतकरी हिताचे शिंदे-फडणवीस सरकार काम करत असताना शेतकर्ऱ्याच्या मनामध्ये अधिकाऱ्याच्या झुलमी कारवाईमुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याचे पाप महावितरण अधिकारी करत होते. त्यामुळे आज हजारो शेतकरी यांना सोबत घेवून महावितरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शेतकर्ऱ्याच्या तिव्र भावना अधिकार्ऱ्याच्या लक्षात आल्या सध्याचा वाढता उन्हाळा हाता तोंडाला द्राक्षचे पीक, डाळींब, जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न हे सर्व महावितरण अधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्याने तात्काळ आजपासून विज सुरळीत करतो असे सर्व शेतकरी बांधवा समोर महावितरण अधिकारी भुतडा यांनी जाहिर केले.
यावेळी हाजारो शेतकरी बांधवासोबत प्रणव परिचारक, सतिश मुळे, कैलास खुळे, लक्ष्मण तात्या धनवडे, तानाजी वाघमोडे, संतोष घोडके, सुदाम मोरे, बाळासाहेब यलमार, सुभाष मस्के, भास्कर कसगावडे, अनिल अभंगराव, माऊली हळणवर, जयसिंग भुसनर, सुनिल भोसले, विक्रम शिरसट, रोहित पानकर, अक्षय वाडकर, रणजित जाधव, लक्ष्मण शिंदे, बालाजी वाघमारे, प्राजक्ता बेणारे, स्मिता पाटील, गणेश सिंघण, दत्तात्रय गुरव, पांडुरंग परिवार पदाधिकारी व भारतीय जनता तालुका व शहर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.