सोलापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रदेश, जिल्हा आणि शहर काँग्रेसला "हात से हात जोडो अभियान" कार्यक्रम दिला असून त्या संदर्भात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवन येथे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर अलकाताई राठोड, सुशीलाताई आबूटे, आरिफ शेख, मा. नगरसेवक रियाज हुंडेकरी, तौफीक हत्तुरे, मा. नगरसेविका परवीन इनामदार, अनुराधा काटकर, फिरदौस पटेल यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आमदार प्रकाश यलगुलवार, प्रदेश चिटणीस अँड मनीष गडदे, N.K. क्षीरसागर यांनी "हात से हात जोडो अभियान" कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच काही नूतन पदाधिकारी यांचे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी काढलेल्या दांडी यात्रेनंतर थंडी, ऊन, पाऊस यांची पर्वा न करता राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ऐतिहासिक अश्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रासह देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचा हेतु सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेऊन सर्वसामान्यांना पक्षासोबत जोडणे हेच आहे. भारत जोडो यात्रेनंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विस्तारित कार्यक्रम म्हणून "हात से हात जोडो अभियान" कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, धार्मिक द्वेष, भ्रस्टाचार, शेतकरी, शेतमजूर, कामगार विरोधी धोरणे, मोदी सरकारचे अपयशी कारभार, देशाची संपत्ती विकणे, सोलापुरचा पाणीप्रश्न व इतर ज्वलंत विषय तसेच महाराष्ट्रातील पन्नास खोके सरकार जनतेचे काहीच काम करत नाही जनता हताश झाली आहे. म्हणून प्रत्येक प्रभागात, वार्डात, नागरिकांच्या घरोघरी प्रत्यक्ष जाऊन जागृती करण्यासाठी सोलापुर शहर जिल्ह्यात "हात से हात जोडो अभियान" लवकरच सुरु करणार आहे. चेतनभाऊ नरोटे यांचे काम जोरात सुरु असून हात से हात जोडो अभियानात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपापल्या भागात हे अभियान राबवावे असे आवाहन केले.
यावेळी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, सध्या देशात, राज्यात ईडीसारख्या संविधानिक संस्थाचा गैरवापर करुन विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. म्हणून राहुलजी गांधी यांनी जनतेत त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. तसेच मोदी सरकारचे चुकीच्या धोरणाविरुद्ध जनतेत जागृती निर्माण करत आहेत. गोरगरीब जनतेचा आवाज बुलंद करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात सर्वसामान्यांना सोबत घेऊन जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी येत्या 26 जानेवारी नंतर "हात से हात जोडो अभियान" राबविण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षासाठी वेळ संघर्षाची आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आत्ता वेळ दिली तरच काँग्रेसचे पूर्वीचे दिवस परत येतील. आणि आपल्याच जोरावर महानगपालिकेवर तिरंगा नक्कीच फड़कवू.
यावेळी प्रदेश चिटणीस अँड मनीष गडदे, नरसिंह आसादे, किसन मेकाले, पंडित सातपुते, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, अंबादास बाबा करगुळे, विश्वनाथ साबळे, NK क्षीरसागर, अंबादास गुत्तिकोंडा, सुनील रसाळे, AD चिनिवार, केशव इंगळे, राजन कामत, वाहिद बिजापुरे, महेश लोंढे, दत्तू बंदपट्टे, हारून शेख, विनोद गायकवाड़, रामसिंग आंबेवाले, हाजीमलंग नदाफ, अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, सुशील बंदपट्टे, जुबेर कुरेशी, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, एजाज बागवान, धौंड़प्पा तोरनगी, हसीब नदाफ, भालचंद्र हंचाटे, अनिल मस्के, सैफन शेख, अमोल भोसले, अप्पासाहेब बगले, मधुकर आठवले, सिद्राम अट्टेलुर, राजन परदेशी, नूर अहमद नालवार, चक्रपाणी गज्जम, संजय गायकवाड, राहुल बोळकोटे, कुणाल घोड़के, सोहेल कुरेशी, प्रतीक आबूटे, दीनानाथ शेळके, सोहेल शेख, जेम्स जंगम, नामदेव फुलारी, इलियास शेख, शिवशंकर अंजनाळकर, शोहेब महागामी, शकील शेख, सत्यनारायण संगा, सुनील व्हटकर, सोमनाथ व्हटकर, रूपेश गायकवाड़, किरण राठोड, कुणाल गायकवाड, विवेक इंगळे, सुभाष वाघमारे, सुनील सारंगी, महेंद्र शिंदे, रफीक चकोले, राजेश झंपले, विकास येळेगावकार, मुन्ना वळसंगकर, पुरुषोत्तम श्रीगादी, रवि हुंडेकरी, शिवराज कोरे, चंद्रकांत टिक्के, दशरथ गायकवाड़, नासिर बंगाली, अनिल वाघमारे, सायमन गट्टू, श्रीनिवास पोटाबत्ती, रवि हुंडेकरी, प्रतीक शिंगे, लालू सानी, शिवानंद बळोरगी, अनिल जाधव, अमोल राठोड, नरेंद्र येलुर, मनोहर सालुंखे, पारुबाई काळे, अंजली मंगोडेकर, मुमताज तांबोळी, संध्याताई काळे, अरुणा वर्मा, रेखा बिनेकर, रेणुका दिनकर, विनाताई देवकते, संघमित्रा चौधरी, पूजा नेल्लूरवार, शोभा बोबे, शिल्पा चांदने, कोंडनताई काकड़े, अश्विनी जाधव, रेणुका मंजुळकर, माया गायकवाड, सुनीता बेरा, स्नेहल शिंदे, मुमताज शेख, लता सोनकांबळे, चंदा काळे, मनीषा भोसले, आम्रपाली कापरे, दत्तात्रय जोकारे, बालाजी जाधव, अयूब शेख, वसिष्ठ सोनकांबळे, अशोक मिसालोलु, मल्लिकार्जुन दर्गोपाटिल, मंगल गायकवाड़, मनीषा मिस्कीन, संकेत माने, शब्बीर फुलमामडी, बापू वाघमोड़े, योगेश सलगर, बबलु घाडगे, अमोल गायकवाड, आरिफ कुमटे, ईसाब मुलानी, पूजा गुडसोलु, शंकर लोखंडे, सागर शिंदे, एन चिंकाराम, सचिन हड़पद, रोहन विजयसिंग, मीना गायकवाड़, द्रौपदी शिवशरण, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आभार कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला, यांनी केले.