वर्धा प्रतिनिधी
येत्या कित्येक दिवसापासून आम आदमी पार्टी, वर्धा मध्ये चाललेल्या अंतर्गत कलह असून मागच्या काही महिन्यापासून कार्यकर्ते पार्टी पासून दुरावत चालल्याचे चित्र समोर दिसून येते.
याचे पडसाद राजकीय पटलावर दिसत आहे. माजी शहर अध्यक्ष श्रीकांत दोड यांनी बरेचश्या कार्यकर्त्या सह राजीनामा दिल्यानंतर आणखी एक फूट पडल्याचे दिसून येते.
आप महिला शहर अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या सह अनेक कार्यकर्ते, महिला. आणि प्रभाग १४ कमेटी सह संपूर्ण वर्धा शहरच्या महिला कमेटी नी राजीनामा दिला आहे. अशी माहिती अंजुताई जिंदे यांनी आज वंचित आघाडी च्या वर्धा जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र मध्ये सुद्धा भेदभाव होत असल्याचा स्पष्ट आरोप यावेळी अंजुताई जिंदे यांनी केला.
राजेंद्र पाल गौतम यांना २२ प्रतिज्ञा प्रकरण मध्ये दिलेला राजीनामा असो, की नोटावर देवांचा फोटो हे आम आदमी पार्टी केवळ डॉ आंबेडकर यांचा फोटो आणि नाव घेऊन. केवळ इमोशनल ब्लॅकमेल करून मताचे राजकारण करून संविधान च्या विरुद्ध पद्धतीने वागत आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव कर्वे यांचा अपमान करणारे व्यक्तव्य करून यांचा साधा निधेष देखील आम आदमी पार्टी, वर्धा ने केला नाही. आंबेडकर आणि भगतसिंग चे नाव फक्त कार्यक्रम आणि राजकारण पुरता आम आदमी पार्टी घेत आहे प्रत्यक्ष आचरणात ती भाजपा ची मदत करत असल्याची माहिती यावेळी अंजुताई जिंदे यांनी दिली.गुजरात विधानसभा निवडणूक च्या वेळी,बिलकीस बानो प्रकरण मध्ये आप ची चुप्पी यामुळे
या द्विधा मनस्थिती आणि परिस्थिती मध्ये काम करू शकणार नाही त्यामुळे बाबासाहेब यांच्या स्वप्नांच्या पूर्ती करिता, काम करण्यात मला अडचणी ज्या जाणूनबुजून दिण्यात आल्या त्याच्या मूळे म्हणून त्या आम आदमी पार्टी चा राजीनामा देत असून बाळासाहेब आंबेडकर आणि अजय रामचंद्र घंगारे, जिल्हाध्यक्ष वर्धा यांच्या नेतृत्वात वंचित आघाडी मध्ये प्रवेश घेत असून त्यांच्या सह कार्यकर्त्याची फळी देखील वंचित मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे निश्चित च वर्धे मधल्या राजकीय वातावरण थंडीत देखील तापल्याचे दिसून येते.
पक्ष प्रवेश च्या वेळी वंचित चे जिल्हाध्यक्ष अजय रामचंद्र घंगारे,सिद्धार्थ डोईफोडे, वसंतराव मुरारकार,संजय हाडके, दादाराव वाघमारे, संदीप नगराळे, संतोष भगत, प्रीतम हाडके, अंकलेश म्हस्के, कांचन सुखदेवे, कविता शर्मा, धम्मशीला मून, गीताताई ताकसांडे, वंदना सहारे, कमल ठाकरे, सुषमा दुपारे
इंदूबाई सुखदेवे यांची आणि ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.