लता पाटिल, रायगड यांच्या कवितेस प्रथम क्रंमाक जाहिर
प्रज्ञा घोडके पुणे दुसर्या क्रंमाकाच्या विजेत्या
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्याक्ष तथा जेष्ठ व सुप्रसिध्द साहित्यिक मा.देविदास खडताळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत काव्यस्पर्धा निकाल घोषित करण्यात आला आहे. या काव्यस्पर्धेत सौ.लता सुरेश पाटिल, रायगड यांच्या पाहुणी या कवितेस प्रथम क्रंमाक जाहिर करण्यात आला आहे. तर सौ.प्रज्ञा घोडके, चिंचवड पुणे यांच्या सांजधार या कवितेस दुसरा क्रमांक जाहिर करण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा या स्पर्धेचे आयोजक नवनाथ अर्जुन पा गायकर, परिषदेचे पदाधिकारी तथा या स्पर्धेचे संयोजक श्रीराम तोकडे, सौ.विदया रविंद्र पाटिल व परिक्षका श्रीमती माधवी ययाती पारख यांनी हा निकाल जाहिर केला आहे.
या स्पर्धेतील तिसर्या क्रंमाकाची विजेती कविता विनोद नंदु इखणकर, नाशिक यांची अभिप्राय नावाची कविता ठरली आहे. चौथ्या क्रंमाकाची विजेती कविता इपरीत नावाची सुबोध पवार ठाणे यांची ठरली आहे तर पाचव्या क्रंमाकावर सौ.उज्वला कोल्हे यांच्या खंत या गझलेने बाजी मारली आहे.
याशिवाय खोगिरभरती - कवी एकनाथ गायकवाड सिंधुदुर्ग, कैफियत- कवी दत्ता देशमुख मोहाडी, दिंडोरी, नाशिक, न कळे कुठे धावताहेत रस्ते - कवियत्री एड.संगिता श्रीकांत केंजळे सातारा, उजळल्या दाही दिशा - कवी रत्नाकर बाबुराव पाटिल धाराशिव, वेल्डर - कवी जनार्दन बाळा गोरे संभाजीनगर या पाच कविताही उत्कृष्ट ठरलेल्या आहे.
या सर्व विजेत्या कवीचें अभिनंदन परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा.शरद गोरे, प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे यांचेसह नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ गायकर, श्रीराम तोकडे, विदया पाटिल, संजय कान्हव, राजु आतकरी, देविदास वारुंगसे, रविंद्र पाटिल, कल्पना सोनवने, देविदास शिरसाट, प्रदिप पाटिल, माधवी पारख, पुनम राखेचा, जनार्दन शिंदे, सुनील कन्नोर, सागर हांडे, बाबासाहेब थोरात, मधुकर कदम, मधुकर पवार, योगेश जोशी, लता पवार, निकिता पवार, गणपत पवार, सुनील गायकवाड, शिवाजी क्षिरसागर, शिवाजी पगारे, शिवाजी शिंदे, सत्यवान वारघडे, एड.पांडुरंग काजळे, देवचंद महाले, अंबादास खोटरे, तुकाराम चौधरी, संजय गडाळे, समाधान कडवे आदिसह असंख्य पदाधिकारी यांनी केले आहे.
या कवीनां लवकरच सन्मानित करण्यात येणार असुन यात सहभागी सर्व कवीच्यां कविता या साहित्य परिषद दिवाळी अंक २०२३ मध्ये प्रसिद्द करण्यात येणार आहे अशी माहिती संपादक नवनाथ गायकर यांनी दिली आहे.