राष्ट्रीय युवा दिन निमित्त युवा संवाद कार्यक्रम
सोलापूर प्रतिनिधी
स्वामी विवेकानंदाचे संपूर्ण जीवन प्रत्येक युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. असे प्रतिपादन युवा व्याख्याता तुकाराम चिंचणीकर यांनी केले. युवकांनी आत्मविश्वास वाढविण्यासाठी विवेकानंद यांचे विचार अंगीकारले पाहिजे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित आयोजित युवा संवाद कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दरवर्षी स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरी केली जाते.
यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, केंद्राचे प्रमुख नंदकुमार चित्तापुरे, उद्योजक पेंटप्पा गड्डम, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, निवृत्त अधिकारी सतीश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
विवेकानंदाना अपेक्षित युवक या विषयावर मार्गदर्शन करताना श्री चिंचणीकर म्हणाले की, स्वामी विवेकांनदाच्या आध्यात्मिक ज्ञान आणि प्रखर राष्ट्रवाद विचारांवर चालणारे, आणि मातृभूमी वर नितांत प्रेम करणारा युवक अपेक्षित आहे. जो नेहमी मानवकल्याण आणि दीन दुबळ्यांची निस्वार्थ सेवा करेल. स्वामीजींच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांची माहिती विविध संदर्भ ग्रंथासह यावेळी त्यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात केंद्राच्या सहना ववतू प्रार्थनेने करण्यात आली. राष्ट्रीय युवा दिनानिमित युवकांसाठी घन घर्जीतसे शब्द स्पर्धा आणि कार्यक्रमात दिलेल्या व्याख्यानवर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. घन घर्जीतसे शब्द स्पर्धेतील विजेत्यांचे नावे – स्नेहल भरले, आम्रपाली चलवादी, श्रीलेखा डलगे, चैतन्य कानडे, पंचनाथ दिंडोरे, शुभम घोलप, हृषीकेश सरवदे, विशाल बिराजदार, कृष्णदेव मुळे, ह्रितिक कुरले आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचे नावे – पर्जन्य अंजुटगी, चेतन कानडे, प्रिथवी धुलगोंड, शौर्य नवले, शेखर निंगदली, सुरेश वाघमोडे, बळवंत जोशी, वैजनाथ शिवांगी, कृष्णा मुळे, महेश भुरे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कुंभार व विनायक केळकर यांनी केले. अंबादास यादव यांनी आभार मानले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून जुळे सोलापूर शाखेच्या वतीने स्वामीजींच्या योग विषयवारील पुस्तकांच्या दालनाचे उद्घाटन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विवेकानंद केंद्राचे सुहास देशपांडे, आनंद टाके, गणेश गुंडेमी, केंद्रीय संचार ब्युरो चे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, आदींनी परिश्रम घेतले.