पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज व आय.सी. एम.एस.कॉलेजमध्ये संस्थापक सचिव.डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘योग्य आहार आणि प्राणायाम: निरोगी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर कोल्हापूर येथील प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्राचे योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ताण तणावातून व्यक्ती,
स्वतःच्या शरीराकडे व आहाराकडे दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे.पूर्वीच्या काळी माणसं, ऋषीमुनी हे साधारणतः दीडशे वर्ष आपले जीवन जगत होते. परंतु आज लोकांमध्ये योग्य आहार, प्राणायाम आणि पुरेशा झोपेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे माणसांत आळस निर्माण होत आहे.याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी मी हिमालय, नेपाळ, कन्याकुमारी, पॉन्डीचेरी आदी ठिकाणी गेलो. त्याठिकाणी मानवाचे आजार आणि आहार यावर अभ्यास केला. त्यानंतर असे आढळले की, मनुष्य हा योग्य आहार घेत नाही. त्याचबरोबर प्राणायामाकडे दुर्लक्ष करतो. यामुळे तो स्वतःहून आजारी पडत आहे.वयोमान कमी करून घेत आहे.अलीकडे अँसिडिटी, बद्धकोष्ठता, स्त्रिया मधील शारिरिक आजार अशा अनेक आजारांना नागरिक आमंत्रण देत आहेत तर ‘हार्ट अटॅक’चे प्रमाणही वाढत आहे, तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत आहे. यासाठी आपणच कारणीभूत आहोत.यासाठी अन्नमयकोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष या पाच प्रकारच्या कोषांवर विजय मिळवल्यास माणूस हा अधिकाधिक वर्षे आपले जीवन जगू शकतो तसेच योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप असेल तर माणसाचे जीवन उत्साही बनते.असे प्रतिपादन योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी यांनी केले.यामध्ये त्यांनी 'योग म्हणजे काय,योग्य आहार कसा असावा' व आजारांना कसे रोखता येईल? याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासाबरोबरच स्वाईप अंतर्गत असलेल्या लोटस इंग्लिश स्कूल, अँड ज्यू.कॉलेज,आय.सी.एम. एस.महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याही विकासासाठी सुरुवातीपासून कटिबद्ध असलेल्या स्वाईप मध्ये योगाचार्य नारायण साळुंखे गुरुजी आजारांबाबतची वास्तवता स्पष्ट करत होते.या कार्यशाळेचे दिप प्रज्वलन स्कूलच्या प्राचार्या.डॉ. जयश्री भोसले,प्रमुख व्याख्याते आचार्य नारायण साळुंखे गुरुजी,नवीन साळुंखे, आय.सी एम.एस.चे विभागप्रमुख प्रा.मुकुंद चौगुले, लोटस इंग्लिश स्कूलचे संतोष गाढवे, लोटस इंग्लिश स्कूलचे ऑफिस सुप्रीडेंट राजकुमार वाघमारे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन केल्यानंतर पुढे गुरुजी म्हणाले की, ‘प्राणायम केल्याने कोणतेही रोग जवळ येत नाहीत. माणूस हा सर्वप्रथम मानसिक दृष्ट्या आजारी पडतो.त्यानंतर तो शरीराने आजारी पडतो. म्हणून मानसिकता जोपासणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर राहावे,जेवणात पालेभाज्या असाव्यात,अधिक तेलकट पदार्थ टाळून नैसर्गिक आहारावर भर द्यावा,निसर्ग भ्रमंती बरोबरच दररोज ध्यानधारणा करणे खूप गरजेचे आहे.या मुळे व्यक्तीच्या चंचल मनावर संयम मिळवता येतो.मैदानी खेळ, नृत्य,संगीत, संभाषण, प्रबोधनपर व्याख्यान ऐकणे, मित्र मंडळी व नातलग यांच्याशी संपर्क वाढवून संवाद साधल्यास माणूस नेहमी उत्साही राहतो.असे सांगून गुरुजींनी आजारांचे प्रकार सांगून आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी, रक्तवाहिन्या, यकृत, फुफ्फुस, किडनी, हे अवयव कसे तंदुरुस्त राहतील याबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी आजार व आहार यासंबंधीचे प्रश्न विचारले असता गुरुजींनी योग्य मार्गदर्शन केले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष.बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी आचार्य नारायण साळुंखे गुरुजी यांनी बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.या कार्यशाळेच्या वेळी स्वाईप फॅमिलीचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग,उपस्थित होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.राजकुमार बंडगर यांनी करून सर्वांचे आभार मानले.