मुंबई प्रतिनिधी
ज्याप्रमाणे मुस्लिमां साठी मक्का आहे, हिंदुसाठी वैष्णोदेवी, अयोध्या आहे, त्याचप्रमाणे जैनांसाठी सम्मेद शिखर आहे.समस्त जैन समाज संघटना, श्री सम्मेद शिखरजी तीर्थ वाचवा अशी मागणी करीत आहे, जैन समाजाचे हृदय आणि पवित्र तीर्थ श्री सम्मेद शिखरजी ला सरकार ने पर्यटन विकास केंद्र बनविण्यास सक्त विरोध केला आहे आणि श्री शत्रुजयं तीर्थlवर केलेल्या बदलावला समस्त दिगंबर जैन, समस्त श्वेतांबर जैन, या सर्व संघटनांचे नेतृत्वाखाली सरकारचे धोरणाला विरोध सुरू आहे. भाजपचे वरिष्ठ नेते तथा मुंबई महानगरपालिका चे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी सांगितले की झारखंड सरकारने 2 ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारला शिफारस केली होती की पारसनाथ चा एक भाग वन्यजीव अभयारण्य आणि पर्यावरण पुरक विभाग जोन तयार करावा . त्या शिफारसी वर केंद्रीय वन मंत्रालयाने हा संपुर्ण विभाग पर्यावरण पूरक विभाग म्हणून मान्यता दिली आहे.सरकार च्या निर्णयामुळे संपुर्ण देशातील जैन समुदाय नाराज आहे.या विभागात इतर कार्याला परवानगी देणे चुकीचे आहे.
भवानजी नी सांगितले की सरकारच्या या निर्णयामुळे सम्मेद शिखरजी चे पावित्रतेला डाग लागेल. लोक मौज मस्तीचा अड्डा बनवतील. ते पुढे म्हणाले की पारसनाथ पहाडी जगात हे जैन समाजाचे सर्वात मोठा तीर्थस्थळ आहे, जैन धर्माचे 20 तीर्थंकरांची मोक्षाचे भूमि मुळे, हे स्थळ त्यांच्या साठी पूजनीय क्षेत्र आहे. 'पारसनाथ' हे झारखंड मधील सर्वात उंच शिखर आहे है, ते चोहोबाजूंनी वनक्षेत्राने व्यापले आहे. त्या डोंगराच्या मध्यात अनेक मंदिरे हजार वर्षापेक्षा अधिक जुने आहेत. बाबूभाई भवानजी ने स्पष्ट शब्दात सांगितले आहे कि सम्मेद शिखरजी ला तीर्थ क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे.
ज्याप्रकारे मुस्लिमांसाठी मक्का आहे, हिंदूंसाठी वैष्णोदेवी, अयोध्या आहे, त्याचप्रमाणे जैनांसाठी सम्मेद शिखर आहे. त्याचे व्यतिरिक्त झारखंड सरकारने हे पर्यटन क्षेत्र घोषित केले आहे, त्यामुळे या क्षेत्राची पवित्रता भंग होईल. भवानजी यांनी सांगितले की सर्व महानुभावांना माझी विनंती आहे, की जैनधर्मीयांची ही मागणी योग्य आहे साथ द्या