आटपाडी प्रतिनिधी
आपल्या राज्यातील सर्व भाविक भक्तांना मायाक्का देवीची यात्रे करिता जाण्याची खूप इच्छा असते.खुप भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. चिंचणी ची यात्रा भक्ती भावाची असते. महाराष्ट्रातील लाखो भाविक मायाक्का देवीच्या दर्शनाला चिंचणी कर्नाटक येथे जात असतात.
यंदाही ५ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा भरत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई व महाराष्ट्रातील भाविकांना टोल माफ करावा असे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांनी तमाम भाविकांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
आपल्या राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चिंचणी यात्रेतील भावी भक्तांना घेण्या जाण्याकरता टोल माफ करतील अशी आशा आहे. अशी माहिती गोपीनाथ पडळकर यांनी दिली.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008