ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर
नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत भलतेच नाटय घडले आहे. कांग्रेस च्या अधिक्रुत उमेदवाराने चक्क माघार घेतल्याने महाविकास आघााडीला तीव्र झटका बसला आहे. दुसरीकडे भाजप व शिंदे गटाने येथे उमेदवारच न दिल्याने अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या समोर तगडे आव्हानच उरले नाही.दरम्यान यामुळे तांबेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघातुन सलग दोनदा आ.सुधीर तांबे यांनी विजय मिळवत प्रतिनिधीत्व केले होते. ते कांग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष तथा माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत.
दरम्यान यंदाही या निवडणुकीत कांग्रेसने या जागेवर पुन्हा एकदा आ.सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली होती. शिवसेना, कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची महाविकास आघाडी असुन ही जागा कांग्रेसच्या वाटयाला आहे. यामुळे येथुन महाविकास आघाडी च्या घटक पक्षानीं उमेदवार दिलेले नव्हते.
दरम्यान कांग्रेस उमेदवार सुधीर तांबे यांनी पक्षाने चक्क ए.बी.फार्म देऊनही माघार घेतल्याने कांग्रेस सह महाविकास आघाडी तोंडावर आपटली आहे. तर दुसरीकडे भाजप व शिंदे गटाने या जागेवर चक्क उमेदवारच न दिल्याने भाजपाची चाणक्य नीतीची खेळी उघड झाली आहे.
कांग्रेस चे उमेदवार तथा आ.सुधीर तांबे यांनी मुलगा सत्यजीत तांबे याचेसाठी पक्ष व उमेदवारीलाही माघार घेत तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे मुलाचा आमदारकीचाही मार्ग मोकळा केला आहे अशी चर्चा रंगते आहे.
दुसरीकडे भाजपने उमेदवार न दिल्याने या मागे भाजपचाही हात असल्याचे स्पष्ट झाले असल्याची जोरदार चर्चा आहे.
एकुणच भाजप व शिंदे गटाने मोठी खेळी करत तांबै यांनाच गळाला लावल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तर या निमित्ताने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगते आहे.
दरम्यान अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या समोर आता कुठलेही पक्षीय आव्हान न उरल्याने व फारसा मातब्बर उमेदवार ही रिंगणात न राहिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग जवळ जवळ मोकळाच झाला असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे.
या पाश्र्वभूमीवर तांबे व भाजप यांचे अंतस्थ काही शिजले होते का ? या चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे कांग्रेस उमेदवार सुधीर तांबे यांनी पक्षपेक्षा पुत्रास प्राधान्य दिल्याने कांग्रेस ही तोंडावर आपटली आहे तर दुसरीकडे डा.सुधीर तांबे यांचे वैयक्तीक ताकदीचे बळावर ही जागा महाविकास आघाडी खेचुन घेईल या स्वप्नावरही पाणी फेरले असुन भाजपच्या फडणवीशी डावपेचाला पुनः एकदा आघाडी फसली आहे. यातुन आघाडीतही आता बिघाडी होते की काय ? याचीही खमंग चर्चा सुरु झाली आहे.
बाकी पहिली फेरी तर तांबे व भाजपने जिंकली आहे यात मात्र कोठलीही शंका घेण्याचे कारण दिसत नाही.