२५९ वर्षापुर्वी पानीपतच्या लढाईत अनेक पिढ्यान पिढ्या खालसा झाली.महाराष्र्टावर आलेल्या संक्रमण काळाचा निषेध म्हणुन संक्रांतीचा हा दिवस शोकदिन म्हणुन हा दिवस पाळण्यासाठी महाराष्र्टीयन स्ञिया या दिवशी काळ्या साड्या घालुन सुहासिनी हळदीकुंकुवाच्या समारंभाचे नियोजन करुन येथेच्छ दान करतात व सौभाग्याची कामना आदिमाया,आदिशक्तीची उपासना करुन करतात.हे जरी सत्य असलेतरी याला शास्ञीय कारणही आहे.
सुर्य देवतेचा मकरराशी मध्ये प्रवेश. अर्थात सृष्टीमातेचा नवश्रृगांर शुभारंभ, सृष्टीला प्रफ्लुलित सुखद परीवर्तनाचा काळाचे स्वागत करणारा तसेच आचर विचार कर्मात शुध्दता,सकारात्मक परीवर्तन घडवणारा म्हणजेच धार्मिकतेची जोड दिलीतर पुण्य संचयासाठी नदीमध्ये स्थानकरुन पाप नष्ट करुन मानाची शुद्धीकरणारा पुण्यपर्वकाळ म्हणजेच मकरसंक्राती.
तसेच दुसर्या दृष्टीकोनातुन विचार केल्यास सुर्याच्या उत्तरायण संक्रमण काळात अतिशय कडक्याची थंडी मुळे हवामानातील बदलामुळे निर्माण झालेले दुषित वातावरण यामुळे आरोग्यावर वाईट परीणाम होवु नये,शरीराला उब मिळावी ह्याहेतु नेत्यावेळच्या थोर विचारवंत, पंडितानी काढलेला सरळ सोपा शास्ञशुध्द पर्यायी मार्ग.
यामुळे स्ञीया निटनेटके ठेवणीतले वस्ञअलंकारांना कधी नव्हेते सणानिमित्ताने उजाळा देण्यासाठी, नटुनथटुन आपला घराण्याची प्रतिष्ठा राघण्यासाठी घराबाहेर पडतात म्हजेच वातावरणाशी एकरुप होतात.
हळदीकुंकुवाच्या समारंभा च्यावेळी एकमेकीला हळदीकुंकु लावल्यामुळे कपाळ्या दोनभुवया मधील आज्ञाचक्राला सक्रिय करतात त्यामुळे स्ञियांच्या मासिक धर्माचे विकार नष्ट होण्यास मदत होते, बुद्धीचा,शाररीक तसेच मानसिक विकास होतो.
तसेच शरीरातील वात,पित्त,कफाच्या प्रकोपात तिळातील स्निग्धता,गुळातीलग्लुकोज व उष्णतेमुळे शरीराला उर्जा,पाचक तसेच पोषक आहार मिळाल्याने त्यांचे आरोग्य सुधारते.
काळ्या रंगात उष्णाता शोषुन घेण्याची क्षमता जास्त असते म्हणुन काळ्यां रंगाच्या साड्यामुळे शरीराचा नैसर्गिक उब मिळते व आपण आरोग्यावर मात करु शकतो.
या निमित्ताने आप्तमिञ,आप्तेष्ट,मैञिणी एकञ गोळा होवुन सुखदु:खाच्या गप्पा मारण्याची सुवर्ण संधी मिळाल्यामुळे मानसिक संतुलन राघल जात.
अशा हा शास्ञशुध्द नियोजनबध्द कार्यक्रमाला धार्मिक महत्व देवुन पिढ्यान पिढा पारंपारीक सण साजरा करतात.
पण आपण शुभ प्रसंगात ज्यांची काहीही चुक नसणार्या माझ्या विधवा माता भगिनींना प्रविञ सणांवारापासुन
वंछित करतो.त्या अशुभ मानुन त्यांना वाळीत टाकतो.
स्वंयपाक घरात सणावाराचा नैवैद्ध,प्रसाद करण्यासाठी विधवा चालते पण त्यांनी बनवलेल्या नैवैध्दाचे ताट घेवुन ती देवासमोर ठेवु शकत नाही,हि किती मोठी शोकांतीका आहे,
पतिच्या मृत्युनंतर आपले सुखदु:ख बाजुला सारुन,कंबर कसुन जी विधवा महिला उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडुन काबाडकष्ट करुन संसाराचा गाढा एकटी ओढते,त्यावेळे ती आपल्या स्वत:च्या सासर,माहेरच्या कुंटुबापासुन सर्व प्रथम वंछित,दुर्लक्षित,उपेक्षित होते,त्यामुळे घराबाहेर पडल्यावर समाजकंटक तिच्या अन्याय अत्याचार करण्यास तिच्यावर तुटुन पडतो.
तरीही समाजाची अवहेलना सहन करत मुलांचे संगोपन सर्वोपरीने करुनही ,जेव्हा मुलांमुलीच्या लग्नसमारंभात माञ याच माऊलीला विधवा अशुभ म्हणुन तिला हळदीचा,कन्यादाना मान मिळत नाही.
पत्नीच्या मृत्युनंतर तो पुरुष विदुर होतो पण कधीही पुरुषाला विदुर कुठेहि संबोधल जात नाही किंवा विदुराला कुठेलेही विषेश आभुषण नसतात.विदुर राजरोशपणे दुसर लग्न थाटामाटात करुन संसारात रममाण होतो.त्यास समाजाची समंती असते.याउलट विधवा स्ञिला आयुष्याशेवट पर्यत विधवा विटंबनेला सामोरे जावे लागते.माञ इच्छा असुनही लग्न करता येत नाही किंवा केल्यास कुंटुबाची व समाजाची नाराजी पत्कारावी लागते.
आज आपण एकवीसाव्या शतकात प्रवेश करत आहोत,विचारामध्ये काही अंशी परीवर्तन दिसुन येत आहे, आपण सर्वांनी त्याचे स्वगत करावे.आई हि मुलांची पहीली गुरु असते,तिच्या एवढा प्रेमळ,दणकट,शक्तीशाली आशीर्वाद अजुन कोणचा असु शकतो?
माझ्या माताभगिनीनो स्ञिही स्ञि पहिली शञु नसुन,मैञिण व्हा.सरहद्द,पोलिस भरती कितीतरी जवान भरती होतात,ते आपले कर्तव्य प्राणप्रणाला लावुन लढतात म्हणुन आपण राञी सुखाने झोपु शकतो.किती आपल्या आया बहिणी सुनानी आपला पती,मुलगा,भाऊ,वडिलांच्या प्रेमापोटी, स्वार्थाच्या बळी देवुन ह्रदयावर दगड ठेवुन देशाच्या संरक्षणासाठी सरहद्दीवर हसत मुखाने पाठवणी केली.त्यांच्या बलीदानानंतर,त्यांनी केलेला प्रविञ त्यागाला विधवा म्हणुन लाछंण लावु नका.
कोरोनाकाळातील किंवा अश्या कुठल्याही येणार्या नैसर्गिक अपत्तीमुळे कितीतरी महिलांचे संसार विनाकारण उघड्यावर पडतात,अश्या वेळेस त्या कुंटुबाला सावरण्याची जबाबदारी फक्त शासनाची नाहीतर समाजाचीही आहे.उलट पतिच्या पश्चाच कुंटुंबाची जबाबदारी पालनपोषण करणारी ती माझी माऊली सर्व श्रेष्ठमाता आहे,ति खर्या अर्थाने सौभाग्याची मानकरी तिच आहे.
वटपोर्णिमेची सत्यवानाची साविञी सर्वांना मनापासुन समजली पण माहात्मा ज्योतीबा फुलेंच्या साविञीबाईनी दिलेला वसाचा सर्वंना विसर पडला आहे.
हाच वसा पुढे चालवुन प्रत्येक कुंटुंब,समाज,देशाच्या विकासासाठी सर्व स्ञियांनी आपल्या स्व: ताच्या घरापासुन सुरुवात केली पाहिजे.कारण आपल्या कुंटुबासोबत असल्याने सौभाग्यवती सुहासिनीना सर्वच बाजुने ती सुरक्षित असते.
जेव्हा एकञ कुंटुब पद्धतीच्या काळामध्ये विधवेचा सांभाळ करण्यासाठी आईवडिल माहेरची माणसे,काहीना सासरीचीही माणसे सूद्धा पालनपोषण करण्यास सक्षम असत. पण सध्या एक कुंटुंब पध्दतीमुळे पतीच्या पश्चात प्रत्येक स्ञि व तिचे कुंटुब सध्याच्या काळात असुरक्षित आहे.
एकीवर अन्याय होत असल्यास सर्व महिलांना तुटुन पडुन अन्याय,अत्याचार विरोधात तिच्या पाठिशी उभे राहुन तिला न्याय व हक्क मिळवुन द्यावा.
विमा पॉलिसी संपर्क 8329354008कोल्हापुर जिल्हातील हिरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर सर्व ग्रामपंचायती ठेवुन विधवा प्रथा बंदचा निर्णयाला शासनानी दिला आहे.
तरी समाजातील बंधु व भगिनींसमवेत राहुन मी शासनाच्या या निर्णयाचा आदर करत मी प्रतिज्ञा करते की,
आज आपण सर्वांनी मिळुन मी आज पासुन परंपरागत नसलेल्या रुढी परंपरेतील विधवा प्रथा बंद करण्यासाठी मी माझ्या कुटुंबातील, समाजातील कोणत्याही महिलेच्या पतीच्या मृत्युनंतर त्या विधवा महिलेच्या कपाळावरचे कुंकु,हातातल्या बांगड्या,वस्ञअंलकार काढणार नाही किंवा काढु देणार नाही.त्यांच्या पुर्नवसन,पुर्नविवाह,कुटुंब व समाजापासुन होण्यार्या अन्याया विरोधात तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन तिला न्याय मिळवुन देवु. शासनाच्या ज्याकाही सर्व योजनाची माहीती तळागळातील महिलेपर्यत पोहचवुन तिच्या सुखदु:खात शेवटपर्यत साथ देवु.कोणत्याही शुभकार्यापासुन त्यांना वंछित न ठेवता त्याचा हिरहिरने सहभाग घेवुन त्यांना योग्य सन्मान मिळवुन देवु.
हाच खरा जिवनाचा सार्थ आहे.
*एकमेकास सहाय्य करु अवघे धरु सुपंथ*
२५ जानेवारी रोजी राज्य महिला आयोगाला २९ वर्षे पुर्ण झाली. राज्य महिला आयोगाचा टोल फ्रि क्रमांक आहे, 155209 या टोल फ्रि क्रंमाकावर डायल करुन आपण विधवा प्रतिबंधक कायदा विषयक तक्रार व त्यांच्याकडुन सहकार्य घेवु शकता.
पुरोगामी समाज व्यवस्थेत स्ञियांचा कोंडलेला मोकळा करणार्या डाॅ.राजाराम मोहन राॅय,धोंडीबा केशव कर्वे आणि माहात्मा ज्योतिबा फुले यांनी क्रांती घडवुन सती,केशवपन,बालविधवा,विधवेचे पुर्नवसन, पुर्नविवाह,अडलेल्या स्ञियांकरीता बांळतपणासाठी गृहे,मुंलाच्या संगोपनासाठी बालसुधारगृहे,मुलांमुलींच्या शिक्षणासाठी वसतीगृहे,शाळा,महिलाआश्रम ,
वडिलोर्पाजित इस्टेवर महिलांचा हक्क मिळवुन देवुन महिलांना जाचक बधनातुन मुक्त केले म्हणुन आज आपण सन्मानाने उभे आहोत.
डाॅ.बाबासाहेबंनी संविधानातील महिलेला दिलेले स्थान व मतदानाचा हक्कामुळे स्ञिया स्वंयपाक घरापासुन अंतराळात,संसदेमध्ये सुद्धा बाजी मारली.
शिवाजी महाराजांने जिजाऊला सती जाण्यापासुन परावृत केले म्हणुन स्वराज्याची स्थापना झाली.क्रांतीज्योती महात्मा ज्योती फुले साविञी घडविली म्हणुन स्ञियांन मध्ये महाक्रांती घडली,रमाबाईनी तोडीची साथ होती म्हणुन संविधान घडल अश्या प्रकारे महाक्रांती घडवुन आणणार्या थोर महामानवांचे फार मोठे उपकाराची परतफेड करयाची असेल तर कानाकोपर्यातुन प्रत्येक घरी ह्या मानवांचे विचार रुजण्यासाठी समाजप्रबोधने झालीतरच नारीशक्तीचा जागर होईल व खर्या अर्थाने स्ञियांमध्ये महाक्रांती झालेली दिसेल.
तिळाची स्निग्धता गुळाची गोडी ।
नात्यामध्ये मिळवु या स्नेहाची गोडी ॥
तिळगुळाचा लाडु काटेरी हलवा ।
नात्यामध्ये सुसंवादाचा गोडवा॥
शुभारंभात जशी हळदीकुंकुाची जोडी।
तशी सखी सुहासनी विधवेची जोडी॥
तरच हसेल कुंकु नेहमी ।
हळद कधीच रुसणार नाही ॥
तिळगुळ घेवुन गोड बोलु ।
गोड राहु गोडवा पसरवु ॥
आदिशक्तीचा जयजयकार असो.
नारीशक्तीचा विजय असो.