भाळवणी प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चेअरमन श्री. कल्याणराव काळेसाहेब यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आहे. सदर प्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रध्वजास राष्ट्रगीतासह सलामी दिली. तदनंतर कारखान्याचे सुरक्षा जवानांनी मानवंदना दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचा कारभार कसा असावा ? कायद्याच्या चौकटीत राहुन कोणते नियम असावेत यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती नेमण्यात आली. समितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, डॉ राजेंद्रप्रसाद, पंडित नेहरु, मौलाना आझाद, डॉ सरोजनी नायडू आणि स्वातंत्र्य चळवळीतील अनेक थोर नेते या घटना समितीचे सभासद होते. या समितीने तब्बल दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस अनेक राज्य घटनांचा अभ्यास करुन अथक परिश्रमाने अनेक सुधारणा करुन म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी या संविधानास मान्यता मिळाली. आपल्या देशाला एक नवा कायदा प्राप्त झाला. हा कायदा म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांच्या हितासाठी चालविलेला कारभार म्हणजेच आपल्या देशात लोकशाही पध्दतीचा कारभार खऱ्या अर्थाने अंमलात आला आसल्यामुळे आपण २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणुन आपल्या देशाचा तिरंगाध्वज फडकवुन वंदन करून मोठ्या आनंदाने हा सण साजरा करीत असल्याचे सांगितले.
सदर प्रसंगी कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखीत राज्यघटना आहे. देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा न करता आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या शूर वीराचे आपल्यावर खूप उपकार असून, आजही सीमेवर जे सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज असून, त्यांचा आपण सदैव सन्मान करणे आपले कर्तव्य् आहे. देशाने आपल्यासाठी काय केले, यापेक्षा आपण देशासाठी काय करु शकतो याचा विचार प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे असे सांगितले.
तसेच कारखाना कार्यस्थळावरील वसंतराव काळे विद्यामंदिर शाळेमध्ये उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन, कारखान्याचे व्हा.चेअरमन मा. श्री. राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी आपला देश सुजलाम सुफलाम करुन प्रगती पथावर नेण्यासाठी बळीराजाने जास्तीत जास्त आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करुन आपल्या शेतीतील पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले पाहिजे, तसेच कष्टाने पिकविलेल्या पिकास चांगला दर मिळाल्यास आपला भारत देश महासत्ता बणल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत करुन उपस्थितांचे लक्ष वेधले, तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतुन देशभक्तीपर भाषण करुन शहिद जवान, क्रांतीकारक वीरांच्या आठवणींना उजाळा दिला.
सदर प्रसंगी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन मारुती भोसले, संचालक मोहन नागटिळक, राजाराम पाटील, बिभिषण पवार, इब्राहिम मुजावर, विलास जगदाळे, नागेश फाटे, माजी संचालक महादेव देठे, काका म्हेत्रे, माजी उपसरपंच भाळवणी दाऊद शेख, प्रगतशिल बागायतदार नागणे सावकार, हणमंत जमदाडेसर कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व पालक उपस्थित होते.