विशेष लेख
खरंतर या विषयावरती मला काय लिहिण्याची इच्छा नव्हती परंतु सध्या जुन्या व्हिडिओ क्लिप पुन्हा व्हायरल करून सुषमा अंधारे अर्थात शिवसेनेला अडचणीत आणण्याचा शेवटचा प्रयत्न चालू झालेला आहे तो मनुवाद्यांकडून! परंतु सुषमाताई असतील, संजय राऊत असतील यांनी सर्वांना रोखठोक, सडेतोड उत्तरे दिली आहेत.
परंतु या निमित्ताने मला लिहिण्यासाठी भाग पडलं, कारण गेली अनेक महिने झाले आपल्या महापुरुषांवरती अवमानकारक भाष्य केले जाते, त्यावेळी ही सर्व मंडळी जे आत्ता म्हणतात की तुम्ही हिंदू धर्माच्या संतांवरती किंवा प्रथावरती चुकीचं आणि वाईट बोलत आहात, आता ही बाई जी स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणवते आजही पंढरपुरातला कुठल्याही गल्लीत या बाईला कोणीही ओळखणार नाही ?अशी ही बाई स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार कसे म्हणवून घेते? हा पहिला प्रश्न आहे. आंधळे,.. अरे तू आंधळी बाई तू त्या सुषमाताईंना प्रश्न विचारते की तुम्ही ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेस रेडा वदवत होते तू तिथे उपस्थित होतेस का? मला असं म्हणायचं आहे अंधारेला तु आंधळे विचारते तू होतीस का तिथं माऊलींची घटना झाली त्यावेळेस, मला कुठल्याही धर्मावरती टीका करायची नाही, तेवढा अधिकारी मी पण नाही परंतु तुला कोणी अधिकार दिला हे सत्य आहे असं सांगण्याचा? का तू वाचते किंवा लोकाला फसवतेस. खोट्या नाट्या असेल किंवा नसेल अशा गोष्टी ही खोटी आहे असं मी दावा करणार नाही आणि म्हणणार सुद्धा नाही. परंतु तू ठामपणे का सांगतेस एवढं?
आंधळे बाई तू सांग हे सगळं जाऊ दे पण ज्यावेळेस छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती संभाजी राजे अशा अनेक महापुरुषांवरती राज्यातील राज्यपालांपासून भाजपातील अनेक आमदार, खासदार, मंत्री यांनी अवमानकारक बोलले त्यावेळेला तुमचे कान बहिरे झाले होते का? तुमच्या आडनावा प्रमाणे तुम्ही आंधळे झाला होतात का ? नाही तेव्हा तोंड उचकटलं तुमचं? तेव्हा कुठल्या बिळात लपून बसला होता तुम्ही? अरे आंधळे बाई तुला लिपस्टिक लावता येते, मेकअप करता येतो, कीर्तनकार म्हणवतेस आणि त्या अंधारे ताईंना बोलण्यावरून नाव ठेवतेस.
त्या बिचार्या आमच्या ताई आजही मेकअप नावाचा प्रकार सुद्धा करत नाहीत, फक्त तिचे वक्तृत्व चांगले आहे, नव्हे वादादित आहे, तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही म्हणून तू कोणाची तरी म्हणण्यापेक्षा एका राजकीय पक्षाची सुपारी घेऊन तिच्या विरोधात व्हिडिओ बनवते आणि प्रसारित करतेस, इतकी तर तू खालच्या पातळीची आहेस परंतु शेवटी सुपारी घेऊन कीर्तन प्रवचन करायला जाण्याची तुझी लायकी ती काय असणार ?
मी सुद्धा तुझ्यावर एवढं लिहून माझी लायकी कमी करतो आहे असं मला वाटायला लागले आहे. परंतु लोकांना ज्यांच्या पुढे तू हे खोटं मांडत आहेस ते तरी सत्य त्यांना कळले पाहिजे असं मला वाटतंय, म्हणून मी इतका वेळ आणि इतकी बौद्धिक शक्ती वाया घालवायला लागलो आहे. तू स्वतः एकदा माझ्यासमोर ये आणि माझ्याशी वाद घाल मी तुला हिंदू धर्म खरा काय आहे, तुला आणि तुला सुपारी देणाऱ्यांना सुद्धा पटवून देईल
उत्तम अभंगराव, पंढरपूर, जिल्हा सोलापूर.
मोबाईल क्रमांक- ८४५९५९१५८३