मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व येथील आनंद नगर या परिसरात कचऱ्याचे ढीग अनेक दिवसांपासून साठलेले आहेत आणि याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ गेली ३-४ वर्षापासून एक बेवारस, नादुरुस्त आणि तुटलेल्या अवस्थेत रिक्षा पडून होती. याच रिक्षाचा वापर आजूबाजूच्या परिसरातील काही मद्य पिणारी मंडळी करीत होती. आनंद नगर परिसरातून रामवाडी, शिवटेकडी परिसरात जाण्यासाठी रस्ता असल्याने बरेचसे नागरिक, महिला, शाळकरी मुले येथून ये-जा करत असतात.
या रिक्षात ठाण मांडून बसलेल्या मंडळीकडून आनंद नगर परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच खासकरून रात्रीच्या वेळी महिला वर्गाबबात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये मे महिन्यात अर्जंदेखील करण्यात आला होता. याच परिसरात राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने ही रिक्षा तेथून उचलण्यात यावी यासाठी मेघवाडी पोलीस स्टेशन, जोगेश्वरी वाहतूक नियंत्रण कक्ष यांना वारंवार तक्रार करून, पाठपुरावा देखील केला. पण या महिलेला संबधित अधिकाऱ्यांनी रिक्षा न उचलण्याची कारणे सांगितली व टाळाटाळ केली.
या महिलेच्या तक्रारीची दखल लोकशाही पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी घेऊन मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मांढरे यांना पुराव्यासहित निदर्शनात आणून दिले. सदर बाबीची तत्काळ दखल घेत मांढरे यांनी घेऊन दोनच दिवसात ती रिक्षा तिथून हटविली. नव्यानेच वपोनि म्हणू पदावर रुजू झालेल्या मांढरे यांनी देखील या गोष्टीची तत्काळ दखल घेतल्याबद्दल त्यांचे विभागातील लोकांनी आभार मानले आहेत.
तसेच हे रिक्षा प्रकरण तडीस नेण्यासाठी निर्भीड लोकशाही च्या पत्रकार धनश्री रेवडेकर, पूनम पाटगावे, सोनल पॅराडिझ सोसायटीचे चेअरमन संतोष वराडकर आणि सोसायटी तील इतर मंडळी, संतोष महाणे, महेश रोडये यांचे विशेष सहकार्य लाभले.